शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

युती-आघाडीकडून घटकपक्ष दुर्लक्षीत; सत्तास्थापनेत प्रमुख पक्षांमध्येच चर्चा !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 12:35 PM

आघाडीचा निर्णय होत नसल्याने मित्रपक्ष पेचात अडकले आहेत. तर युतीच्या मित्रपक्षांना भाजपशिवाय पर्याय नाही. त्यातच प्रमुख पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने घटक पक्षांना पुढील भवितव्य सत्तेत की विरोधात हे कळायला मार्ग उरला नाही.  

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. तर प्रमुख राजकीय पक्षांच ठरत नसल्याने सर्वांच घटकांची कोंडी होत आहे. या गोंधळात युती आणि आघाडीसोबत असलेले मित्रपक्ष चांगलेच हैराण झाले आहेत. 

शिवसेना समसमान वाटपासाठी आग्रही असल्यामुळे युतीत खिंडार पडले आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा करत सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तर भाजपने आपण सत्तास्थापनेसाठी असमर्थ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपसोबत असलेल्या मित्रपक्षांना पुढे काय असा प्रश्न पडला आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. शिवसेनेसोबत महाशिवआघाडी करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात शरद पवार आणि सोनिया गांधी करतील ती पूर्व दिशा आहे. परंतु, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेकाप हे कुठेही दिसत नाहीत. अर्थात आघाडीच्या चर्चेपासून ते दूर आहेत.  

दुसरीकडे युतीसोबत असलेले विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष , महादेव जाणकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती पक्ष अजुनही भाजपची सत्ता येईल याच आशेवर आहे. या तिन्ही मित्रपक्षांच्या उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. त्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांना भाजपच्याच भूमिकेवर लक्ष ठेवून राहावे लागत आहे. 

एकूणच आघाडीचा निर्णय होत नसल्याने मित्रपक्ष पेचात अडकले आहेत. तर युतीच्या मित्रपक्षांना भाजपशिवाय पर्याय नाही. त्यातच प्रमुख पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने घटक पक्षांना पुढील भवितव्य सत्तेत की विरोधात हे कळायला मार्ग उरला नाही.