शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सहामाही परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास की नापास?; शरद पवारांनी सांगितला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 09:21 IST

Sharad Pawar Interview with Sanjay Raut: अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत लगेचच निष्कर्ष काढणं योग्य नाही. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसत आहे.

ठळक मुद्देशेवटी राज्यप्रमुख महत्त्वाचा असतो, त्यांच्या नेतृत्वाखाली टीम काम करतेसध्या अर्थव्यवस्थेचं संकट आहे, ती रुळावर आणणं हे आव्हान आहे.अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत लगेचच निष्कर्ष काढणं योग्य नाही

मुंबई – राज्याच्या राजकारणात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घ्यावं अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्य सरकारला ६ महिने पूर्ण झाली आहेत. त्यावर सामनाच्या मुलाखतीत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या कामाचा रिपोर्ट कार्ड सांगितलं आहे.

मुलाखतीत (Sharad Pawar Interview with Sanjay Raut) संजय राऊत यांनी सहा महिने परीक्षेचा काळ असतो, या परीक्षा झाल्यानंतर त्याचं प्रगती पुस्तक पालकांकडे येते तसं या सरकारच्या सहा महिन्याचं प्रगती पुस्तक आपल्याकडे आलंय का? असा प्रश्न केला होता. त्यावर शरद पवारांनी बरोबर आहे, पण आता ही सहा महिन्यांची परीक्षा झालीय, परीक्षा संपूर्ण झाली असं मला वाटत नाही. परीक्षेतला प्रॅक्टिकलचा भाग अजूनही बाकी आहे. आता कुठे लेखी परीक्षा झाली आहे. पण त्या परफॉर्मन्सवरुन तरी प्रॅक्टिकलमध्येही हे सरकार यशस्वी होईल असा ट्रेंड दिसतोय असं शरद पवारांनी सांगितले.

तसेच अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत लगेचच निष्कर्ष काढणं योग्य नाही. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसत आहे. त्यामुळे निकालाची चिंता बाळगावी अशी स्थिती दिसत नाही. राज्याचा विचार करुन तुम्ही विचारत असाल तर या महिन्याच्या परीक्षेत आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झाला आहे. तो पुढची परीक्षा, पुढचे पेपरही सहजपणे सोडवेल अशी खात्री आहे असंही शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar Sanjay Raut Interview)

दरम्यान, शेवटी राज्यप्रमुख महत्त्वाचा असतो, त्यांच्या नेतृत्वाखाली टीम काम करते, त्यामुळे त्याचे श्रेयसुद्धा त्यांनाच मिळणार. त्याचसोबत सध्या अर्थव्यवस्थेचं संकट आहे, ती रुळावर आणणं हे आव्हान आहे. या संकटकाळात हे फार मोठं चॅलेंज आहे असं शरद पवारांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीचं कौतुक

उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) स्वभाव आहे तो त्यांना साजेसा आहे. निर्णय घ्यायचा, तो अत्यंत सावधगिरीनं, हळूहळू, त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत, याची जेवढी खातरजमा करुन घेता येईल तेवढी करुन मग त्याच्यावर पाऊल टाकायचं अशा शब्दात शरद पवारांनी मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक केलं आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांकडून नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार; राजकारणात कुणी कुणाचाच गुरु नसतो, तर...

'हा' आहे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधला महत्त्वाचा फरक; शरद पवारांचं निरीक्षण

राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची जोरदार मागणी

अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार काँग्रेस; पक्षाच्या खासदारांशी सोनिया गांधींची चर्चा

पाहा व्हिडीओ

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस