शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

बुद्धिभेद करणाऱ्या फुटीरतावादी विचारांपासून सावध राहा : फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 10:20 AM

देशात नक्षलवादी, माओवाद्यांनी सर्वात जास्त हत्या वनवासींच्या केल्या आहेत.

औरंगाबाद : तुमचे आरक्षण काढून घेतले जाईल, तुम्हाला या देशातून बाहेर काढले जाईल, असे फुटीरतेचे बीजारोपण काही राजकीय पक्ष मतासाठी करीत आहेत. या देशाची संस्कृती जतन करणाऱ्या व देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान देणाऱ्या अदिवासी, वनवासी बांधवांनी बुद्धिभेद करणाऱ्या आणि फुटीरतावादी विचारधारेपासून सावध राहावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

औरंगाबाद येथील अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्न देवगिरी कल्याण आश्रमाचे वतीने कार्यकर्त्यांच्या महासमेलनाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की, वनवासी म्हणजे मागासलेले असे म्हटले जाते. मात्र, या देशावर झालेले अनेक हल्ले परतविण्यासाठी या वनवाशांनी जिवाची बाजी लावत सशस्त्र लढा दिला असल्याचे ते म्हणाले.

तर स्वातंत्र्यलढ्यात वनवासींचे योगदान मोठे आहे. अनेक हल्ले होत असताना त्यांनी आपली संस्कृती, बोली भाषा जतन करून ठेवली. पर्यावरणाला, निसर्गाला मित्र मानून जीवन जगत आहे. खऱ्या अर्थाने वनवासी हे मागासलेले नव्हे तर विचाराने प्रगत आहेत. मात्र, याच देशात या वनवासींना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले असल्याचेही फडणवीस म्हणाले.

देशाच्या मुख्य प्रवाहात आणल्या शिवाय आदिवासी, वनवासी समाजाची प्रगती होणार नाही. या समाजाची प्रगती झाली नाही तर देशाची प्रगती होणार नाही. तर देशात नक्षलवादी, माओवाद्यांनी सर्वात जास्त हत्या वनवासींच्या केल्या आहेत. देशात फूट पाडणाऱ्या आणि तुकडे करू पाहणाऱ्या लोकांना थांबवायचे असल्यास तंट्या भिल्ल आणि बिरसा मुंडांचा इतिहास देशातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.