शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

लहानग्यांमध्येही वाढतेय उदासीनता

By admin | Updated: April 7, 2017 01:57 IST

मला त्याने बर्थडेला बोलावले नाही, यासाठी कुणी दिवसभर अबोला धरते’, तर ‘आई-बाबांनी स्मार्टफोन घेतला नाही

मुंबई : ‘मला त्याने बर्थडेला बोलावले नाही, यासाठी कुणी दिवसभर अबोला धरते’, तर ‘आई-बाबांनी स्मार्टफोन घेतला नाही म्हणून चिडचिड करणे’, ‘फोटोला लाइक्स केले नाही कुणीच’, ‘बेस्ट फ्रेंडशी भाडण झाले म्हणून जेवतच नाही’ अशा छोट्या-छोट्या टप्प्यांतून भविष्यात लहानग्यांच्या वाट्याला नैराश्य-उदासीनता येते, असे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने एका सर्वेक्षणांती नोंदविले आहे.लहानग्यांमधील मनोविकारामध्ये प्रामुख्याने वर्तणुकीतील दोष किंवा विकृती, नैराश्य, अनामिक भीती इ. लक्षणे दिसून येतात. लहान मुलेही अनेक वेळा निराश झालेली असतात, मात्र याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. यामुळे मुलांना अनेक मानसिक आजारांशी सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांची उदासीनता लवकरात लवकर ओळखून त्यावर योग्य उपाय करावा, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संस्थेने यंदाचे वर्ष नैराश्याबद्दल जनजागृतीसाठी जाहीर केले आहे. ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन जगभर साजरा केला जातो. उदासीनता ही अशी एक मानसिक अवस्था आहे, जी दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सुरू राहू शकते. मात्र यानंतर ती गंभीर रूपही धारण करू शकते. कोणतीही गोष्ट करायला कंटाळा करते. सतत नकारात्मक विचार मनात डोकावत राहतात. नेहमीचे आयुष्य कोलमडून जाते अशा अवस्थेत मुले असली तर ती दुसऱ्यांचे अधिक नुकसान करू शकतात. त्यातूनच मग ती आत्महत्येचा पर्याय निवडतात, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विद्याधर बापट यांनी सांगितले. साधारणत: महिन्याभरात उदासीनता असलेल्या १० ते २० टक्के लहानग्यांवर उपचार सुरू करावे लागतात, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती सांगळे यांनी दिली. (प्रतिनिधी)काय कराल?मुलांकडून अवास्तव अपेक्षा न बाळगता त्यांची क्षमता समजून घ्यावी. प्रत्येक वेळी ओरडून किंवा मारून सांगण्यापेक्षा त्यांच्या भावना समजून घ्याव्यात.मुलांचे म्हणणे ऐकून घ्यावे, प्रत्येक वेळी ते काय सांगताहेत हे नीट लक्षपूर्वक ऐकावे.सतत त्यांना उपदेश करू नका किंवा प्रत्येक वेळी सल्ला देऊ नका. त्यांचा आत्मविश्वास सतत जागरूक ठेवा.कधीही आपल्या मुलाची इतर मुलांच्या बरोबर तुलना करू नका.उदासीनतेमागची कारणेआजकालची मुले अधिक प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. या तंत्रज्ञानावरच ती बऱ्याचदा अवलंबून असतात. कारण या सोशल नेटवर्किंग साइटवरून सतत एकमेकांशी चढाओढ करत असतात. सतत एकमेकांशी चढाओढ झाल्यामुळे आपण कुठे तरी कमी पडतो आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण होते आणि मुलांमध्ये आपोआपच डिप्रेशन येते. मुले मानसिक आजाराला बळी पडण्याचे मोठे कारण म्हणजे मुलं जेव्हा पालकांना काही तरी सांगत असतात, तेव्हा पालक त्यांचे काहीही ऐकून घेत नाहीत. त्यांच्या शाळेत काय घडते हे ते सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे.आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका. कधी कधी पालक आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा करतात, म्हणजे आपली पूर्ण न झालेली स्वप्ने ते मुलांमार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. या दडपणाखाली मुले सतत आल्याने ती डिप्रेशनमध्ये जातात.आजकाल आई-वडील दोघंही नोकरी करत असल्यामुळे त्यांचे कित्येक तास घराबाहेरच जातात. त्यामुळे मुलांना आई-वडिलांसोबत वेळ मिळत नाही.