शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

लहानग्यांमध्येही वाढतेय उदासीनता

By admin | Updated: April 7, 2017 01:57 IST

मला त्याने बर्थडेला बोलावले नाही, यासाठी कुणी दिवसभर अबोला धरते’, तर ‘आई-बाबांनी स्मार्टफोन घेतला नाही

मुंबई : ‘मला त्याने बर्थडेला बोलावले नाही, यासाठी कुणी दिवसभर अबोला धरते’, तर ‘आई-बाबांनी स्मार्टफोन घेतला नाही म्हणून चिडचिड करणे’, ‘फोटोला लाइक्स केले नाही कुणीच’, ‘बेस्ट फ्रेंडशी भाडण झाले म्हणून जेवतच नाही’ अशा छोट्या-छोट्या टप्प्यांतून भविष्यात लहानग्यांच्या वाट्याला नैराश्य-उदासीनता येते, असे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने एका सर्वेक्षणांती नोंदविले आहे.लहानग्यांमधील मनोविकारामध्ये प्रामुख्याने वर्तणुकीतील दोष किंवा विकृती, नैराश्य, अनामिक भीती इ. लक्षणे दिसून येतात. लहान मुलेही अनेक वेळा निराश झालेली असतात, मात्र याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. यामुळे मुलांना अनेक मानसिक आजारांशी सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांची उदासीनता लवकरात लवकर ओळखून त्यावर योग्य उपाय करावा, असे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संस्थेने यंदाचे वर्ष नैराश्याबद्दल जनजागृतीसाठी जाहीर केले आहे. ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन जगभर साजरा केला जातो. उदासीनता ही अशी एक मानसिक अवस्था आहे, जी दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सुरू राहू शकते. मात्र यानंतर ती गंभीर रूपही धारण करू शकते. कोणतीही गोष्ट करायला कंटाळा करते. सतत नकारात्मक विचार मनात डोकावत राहतात. नेहमीचे आयुष्य कोलमडून जाते अशा अवस्थेत मुले असली तर ती दुसऱ्यांचे अधिक नुकसान करू शकतात. त्यातूनच मग ती आत्महत्येचा पर्याय निवडतात, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विद्याधर बापट यांनी सांगितले. साधारणत: महिन्याभरात उदासीनता असलेल्या १० ते २० टक्के लहानग्यांवर उपचार सुरू करावे लागतात, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती सांगळे यांनी दिली. (प्रतिनिधी)काय कराल?मुलांकडून अवास्तव अपेक्षा न बाळगता त्यांची क्षमता समजून घ्यावी. प्रत्येक वेळी ओरडून किंवा मारून सांगण्यापेक्षा त्यांच्या भावना समजून घ्याव्यात.मुलांचे म्हणणे ऐकून घ्यावे, प्रत्येक वेळी ते काय सांगताहेत हे नीट लक्षपूर्वक ऐकावे.सतत त्यांना उपदेश करू नका किंवा प्रत्येक वेळी सल्ला देऊ नका. त्यांचा आत्मविश्वास सतत जागरूक ठेवा.कधीही आपल्या मुलाची इतर मुलांच्या बरोबर तुलना करू नका.उदासीनतेमागची कारणेआजकालची मुले अधिक प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. या तंत्रज्ञानावरच ती बऱ्याचदा अवलंबून असतात. कारण या सोशल नेटवर्किंग साइटवरून सतत एकमेकांशी चढाओढ करत असतात. सतत एकमेकांशी चढाओढ झाल्यामुळे आपण कुठे तरी कमी पडतो आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण होते आणि मुलांमध्ये आपोआपच डिप्रेशन येते. मुले मानसिक आजाराला बळी पडण्याचे मोठे कारण म्हणजे मुलं जेव्हा पालकांना काही तरी सांगत असतात, तेव्हा पालक त्यांचे काहीही ऐकून घेत नाहीत. त्यांच्या शाळेत काय घडते हे ते सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे.आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका. कधी कधी पालक आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा करतात, म्हणजे आपली पूर्ण न झालेली स्वप्ने ते मुलांमार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. या दडपणाखाली मुले सतत आल्याने ती डिप्रेशनमध्ये जातात.आजकाल आई-वडील दोघंही नोकरी करत असल्यामुळे त्यांचे कित्येक तास घराबाहेरच जातात. त्यामुळे मुलांना आई-वडिलांसोबत वेळ मिळत नाही.