शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

साई बाबांची प्रगटभूमी असलेल्या 'धुपखेडा'च्या विकासाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 4:25 PM

साक्षात्कार झाल्यांनतर सुरवातीचे काही काळ साई बाबा याच गावात राहिले असल्याचा दावा गावकरी करतात.

औरंगाबाद : साईबाबा यांच्या जन्मस्थानाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. साईंच्या कर्मभूमी आणि जन्मभूमीच्या मुद्यावरून वाद सुरु असतानाचं आता साईबाबा यांच्या प्रगट भूमीचा मुद्दा समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील धुपखेडा हे साईबाबांची प्रगट भूमी असल्याचा इतिहास असल्याचे बोलले जाते. त्यामुळे जन्मभूमीप्रमाणे साईबाबा यांच्या प्रगट भूमीचा सुद्धा विकास करण्याची मागणी साई भक्तांकडून होत आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी असा साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डीतील भाविकांमध्ये नाराजी आहे. तर राज्य शासनाने पाथरी येथील साई जन्मभूमीच्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर शिर्डी येथील काही भाविकांकडून जन्मभूमीबाबत वाद उकरून काढला जात असल्याचे म्हणत पाथरीतील भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

साईंच्या कर्मभूमी आणि जन्मभूमीच्या मुद्यावरून वाद सुरु असतानाचं आता साईबाबा यांच्या प्रगट भूमीचा मुद्दा समोर आला आहे. साईबाबा यांची प्रगट भूमी म्हणून ओळखले जाणारे धुपखेडा गाव औरंगाबादेतील पैठण तालुक्यात आहे. मात्र हे गाव शिर्डीप्रमाणे मोठ होऊ शकले नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे राज्य शासनाने पाथरी येथील साई जन्मभूमीच्या १०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे, त्याचप्रमाणे साईबाबा यांच्या प्रगट भूमीचा सुद्धा विकास करण्याची मागणी परिसरातील साई भक्तांकडून होत आहे.

धुपखेड्याच्या ग्रामस्थांचा नेमका दावा काय आहे?

साक्षात्कार झाल्यांनतर सुरवातीचे काही काळ साईबाबा याच गावात राहिले असल्याचा दावा गावकरी करतात. तर याच गावात त्यांचे मंदिर असून, बाबा जेव्हा भिक्षा मागून यायचे तेव्हा ते याच ठिकाणी झोपत असल्याचे सुद्धा गावकरी सांगतात. त्यांनतर बराच काळ बाबा याठिकाणी वास्तव्यास असल्याचे गावकरी सांगतात. तर शिर्डीप्रमाणे ईतेही मंदिरा शेजारी 2 कडू लिंबाचे झाड असून योगायोग म्हणजे शिर्डीप्रमाणेचं या झाडांची पाने सुद्धा गोड असल्याचेही गावकरी सांगतात.

काही वर्षांच्या वास्तव्यानंतर साईबाबा हे गावातील चांद पटेल यांच्या नातेवाईकाच्या लग्नात शिर्डीत गेले. त्यानंतर शिर्डीतील खंडोबा मंदिराचे पुजारी मालासापती यांनी बाबांना शिर्डीतंच थांबवून घेतले. कालांतराने साईंच्या चमत्काराने शिर्डीला मोठ केलं. तर साईबाबा या गावात राहिले म्हणून धुपखेड्यात त्यांचे मंदिर असून मोठ्याप्रमाणावर भक्त या गावाला भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे साईंच्या कर्मभूमी आणि जन्मभूमीप्रमाणे प्रगटभूमीचा विकास करण्याची मागणी येथील साईमंदिराचे अध्यक्ष पांडूरंग वाघचौरे यांनी केली आहे.