शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा दाखल करण्यास विलंब; महाठग झाला फरार

By admin | Updated: September 27, 2016 00:35 IST

गुंतवणुकीवर अल्पावधीत भरघोस व्याज देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या मोहनप्रसाद श्रीवास्तव आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुंतवणूकदारांनी लेखी

मुंबई : गुंतवणुकीवर अल्पावधीत भरघोस व्याज देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या मोहनप्रसाद श्रीवास्तव आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुंतवणूकदारांनी लेखी तक्रारी करूनही गुन्हा दाखल करण्यास मुंबई पोलिसांनी तब्बल चार महिन्यांचा कालावधी घेतल्याने दरम्यानच्या काळात आरोपी फरार होऊ शकले, असा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे.मुंबईतील गुंतवणूकदारांचे सातशे कोटी रुपये हडप करण्याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण तपासासाठी आपल्या हाती घेतले आहे. आरोपी मोहनप्रसाद श्रीवास्तव, त्याची पत्नी विभा, मुलगा कार्तिक, सून प्रीती, मुलगी अर्चिता आणि धर्मेंद्र निकुंभ यांच्याविरुद्ध २१ एप्रिल २0१६ रोजी पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्या तक्रारींची दखल घेत आरोपींविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान, आपल्याविरोधात तक्रार दाखल झाल्याने पोलीस कारवाई होऊ शकते याची कल्पना आल्याने श्रीवास्तव कुटुंबीय फरार झाल्याचे डॉ. केदार गानला यांच्यासह इतर गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. आरोपी फरार होण्यास पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत असल्याने एफआयआर दाखल करण्यास विलंब करणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी केली आहे. आरोपी उत्तर भारतात लपले असून, रक्कम त्यांनी त्यांच्या तेथील बांधकाम प्रकल्पांमध्ये गुंतवल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. मात्र या व्याप्ती लक्षात घेता हे प्रकरण सीबीआय अथवा सक्तवसुली संचालनालयाकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)