शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराचा कोट्यवधीचा बारदाना दुर्लक्षित

By admin | Updated: May 29, 2014 01:13 IST

तांदुळाचा बारदाना योजनेच्या प्रारंभापासूनच गोळा न केल्याने या करोडो रुपयांच्या बारदान्याच्या हिशेबाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आकोट : संपूर्ण राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरविण्यात येणार्‍या तांदुळाचा बारदाना योजनेच्या प्रारंभापासूनच गोळा न केल्याने या करोडो रुपयांच्या बारदान्याच्या हिशेबाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची शाळेत नियमित उपस्थिती राहावी आणि त्यांच्या मध्यान्ह भोजनाची सोय व्हावी, या दुहेरी हेतूने शासनाने शालेय पोषण आहाराची योजना कार्यान्वित केली. त्यासाठी भोजनाचे प्रमाण निश्‍चित करून प्रत्येक शाळेला तांदूळ तथा खिचडीकरिता लागणारे मसाल्याचे पदार्थ पुरवण्यात येतात. यामधील महत्त्वाचा घटक असलेला तांदूळ गोणपाटाच्या कट्टय़ात ५0 किलोच्या प्रमाणात पुरवण्यात येतो. यातील तांदूळ तथा अन्य किराणा मालाचा कागदोपत्री नीट हिशेब ठेवल्या जातो. त्यासाठी साठा पुस्तिकेत प्रत्येक वाणासाठी कॉलम आहेत; परंतु बारदाना जमा करण्याबाबत कुठेच उल्लेख नाही. परिणामी गोणपाटाच्या या कट्टय़ांचा हिशेब कुठेच ठेवल्या जात नाही. हा प्रकार अगदी योजना सुरू झाल्यापासूनच सुरू आहे. शासनानेही या बाबीकडे समूळ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे किमान ८ वर्षांंपासून या बारदान्याचे लाखो कट्टे गहाळ झालेले आहेत. बाजारात या खाली कट्टय़ांची किंमत १४ ते १६ रुपये आहे. बाजार भावाचा हा संदर्भ घेतल्यास आजवर शासनाचे करोडो रुपये मातीत गेले असल्याचे दिसून येते. शासनच विचारीत नाही म्हणून तर अधिकारी हिशेब मागीत नाही म्हणून खिचडीवाले शिक्षक या बारदान्याबाबत उदासीन आहेत; परंतु यातील काही बेरकी लोकांनी मात्र बारदान्याचे महत्त्व ओळखून हा बारदाना हातोहात लंपास केला आहे. काही शिक्षकांनी बारदाना गोळा करण्याचा प्रयास केला; परंतु जेथे विद्यार्थ्यांनाच बसण्यास वर्ग खोल्यांची मारामार आहे, तेथे बारदान्यासाठी एक संपूर्ण वर्गखोली का गुंतवून ठेवावी, हा सुज्ञ विचार करून त्या शिक्षकांनी बारदाना गोळा करण्याचा विचार त्यागला. जो बारदाना गोळा केला तो पायपुसणी म्हणून विद्यार्थी व शिक्षकांच्या पायदळी तुडविल्या गेला. यातून जो बारदाना वाचवला त्यावर उंदरांनी ताव मारून निरुपयोगी करून टाकला आहे. संपूर्ण राज्यातील शाळांमधून हा बारदाना बाजारात आणला असता, तर त्यापोटी शासनास करोडोचा लाभ झाला असता; परंतु शासन, अधिकारी तथा शिक्षकांच्या उदासीन धोरणाने करोडो रुपयांच्या बारदान्याची पुरती वाट लागली आहे. हा बारदाना सुरक्षित राहून त्यावर महसूल प्राप्त करण्यासाठी तांदूळ व किराणा मालासोबतच बारदान्याचा हिशेब ठेवणे अतिशय गरजेचे आहे. त्यासोबतच दरमहा गोळा केलेला बारदाना संकलित करून शासनानेच त्याच्या साठवणुकीची तथा सुरक्षेची हमी घेणे, हे शासनाच्या आर्थिक हिताचे आहे.