शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus ‘ते’ तबलिगी समोर न आल्यास कठोर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 05:54 IST

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती; मोबाइल स्विच आॅफ केलेल्यांचाही सुरू आहे शोध

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तबलिगी जमातीचे जे लोक दिल्लीच्या मरकजहून परतले त्यांच्यापैकी महाराष्ट्रात परतलेल्या १,३५५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यापैकी १३०० जणांच्या आवश्यक चाचण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वा त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जे लोक स्वत:हून हजर होणार नाहीत त्यांचा आम्ही शोध घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गृहमंत्री आनिल देशमुख यांनी दिला आहे.

‘लोकमत’शी बोलताना देशमुख म्हणाले की, त्यांच्यापैकी ५०-५५ लोक असे आहेत की ज्यांना अद्याप ताब्यात घेता आलेले नाही किंवा ते स्वत:हून हजर झालेले नाहीत. बहुतेकांनी मोबाईल स्विच आॅफ केलेले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यात अडचणी येत आहेत. मोबाईल स्विच आॅफ असला तरी त्याचा ठावठिकाणा आजकाल काढता येतो. सायबर सेलच्या माध्यमातून तसे प्रयत्न केले जात आहेत. लवकरच त्याला यश येईल. दिल्लीच्या मरकजमध्ये महाराष्ट्रातून जे लोक गेले होते त्यांची नावे, पत्ते आम्ही दिल्लीतून मिळवले, त्यानुसार शोध मोहीम राबविली. काहीजण स्वत:हून पोलीस व आरोग्य यंत्रणेकडे हजर झाले व त्यांनी सहकार्य केले.

लाठी वापरण्यास भाग पाडू नकालॉकडाऊनच्या काळात बंदी आदेश मोडून लोक बेफाम फिरत असतील तर लाठी चालवावीच लागेल, याचा देशमुख यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, बेफाम लोकांनी पोलिसांवर हल्ल्याच्या ४८ घटना घडल्या आहेत. त्यात शंभरावर लोकांना अटक करण्यात आली.बंदी मोडणाऱ्या नागरिकांची ७,५७० वाहने जप्त केली आहेत. ६६ लाख रुपयांचा दंडही आकारला आहे.

११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटकाकारागृहात असलेले ११ हजार आरोपी व कैदी यांच्या पॅरोलबाबतही सर्व ६० कारागृहांना निर्देश देऊन कैद्यांच्या गुन्हे व झालेल्या शिक्षेच्या अनुषंगाने पॅरोलवर सोडण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे सूचित केले. त्यानुसार हे कैदी पॅरोलवर सुटत आहेत.

सायबर गुन्ह्यास अटकावक्वारंटाईनबाबत जे चुकीचे संदेश समाज माध्यमाद्वारे पसरविण्यात येत होते त्यांनाही आळा बसला आहे. या चुकीच्या संदेशांबाबत ३४७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे . तसेच भादविच्या कलम १८० नुसार २३ हजार १२६ घटनांची नोंद झाली आहे.कोरोनासंदर्भात समाज माध्यमावर होत असलेल्या अपप्रचारास अटकाव करण्याचे निर्देश दिल्यामुळे यात एप्रिल फुलसारख्या संदेशांनाहीरोख लागला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAnil Deshmukhअनिल देशमुख