शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

CoronaVirus ‘ते’ तबलिगी समोर न आल्यास कठोर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 5:53 AM

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती; मोबाइल स्विच आॅफ केलेल्यांचाही सुरू आहे शोध

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तबलिगी जमातीचे जे लोक दिल्लीच्या मरकजहून परतले त्यांच्यापैकी महाराष्ट्रात परतलेल्या १,३५५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यापैकी १३०० जणांच्या आवश्यक चाचण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वा त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जे लोक स्वत:हून हजर होणार नाहीत त्यांचा आम्ही शोध घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गृहमंत्री आनिल देशमुख यांनी दिला आहे.

‘लोकमत’शी बोलताना देशमुख म्हणाले की, त्यांच्यापैकी ५०-५५ लोक असे आहेत की ज्यांना अद्याप ताब्यात घेता आलेले नाही किंवा ते स्वत:हून हजर झालेले नाहीत. बहुतेकांनी मोबाईल स्विच आॅफ केलेले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यात अडचणी येत आहेत. मोबाईल स्विच आॅफ असला तरी त्याचा ठावठिकाणा आजकाल काढता येतो. सायबर सेलच्या माध्यमातून तसे प्रयत्न केले जात आहेत. लवकरच त्याला यश येईल. दिल्लीच्या मरकजमध्ये महाराष्ट्रातून जे लोक गेले होते त्यांची नावे, पत्ते आम्ही दिल्लीतून मिळवले, त्यानुसार शोध मोहीम राबविली. काहीजण स्वत:हून पोलीस व आरोग्य यंत्रणेकडे हजर झाले व त्यांनी सहकार्य केले.

लाठी वापरण्यास भाग पाडू नकालॉकडाऊनच्या काळात बंदी आदेश मोडून लोक बेफाम फिरत असतील तर लाठी चालवावीच लागेल, याचा देशमुख यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, बेफाम लोकांनी पोलिसांवर हल्ल्याच्या ४८ घटना घडल्या आहेत. त्यात शंभरावर लोकांना अटक करण्यात आली.बंदी मोडणाऱ्या नागरिकांची ७,५७० वाहने जप्त केली आहेत. ६६ लाख रुपयांचा दंडही आकारला आहे.

११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटकाकारागृहात असलेले ११ हजार आरोपी व कैदी यांच्या पॅरोलबाबतही सर्व ६० कारागृहांना निर्देश देऊन कैद्यांच्या गुन्हे व झालेल्या शिक्षेच्या अनुषंगाने पॅरोलवर सोडण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे सूचित केले. त्यानुसार हे कैदी पॅरोलवर सुटत आहेत.

सायबर गुन्ह्यास अटकावक्वारंटाईनबाबत जे चुकीचे संदेश समाज माध्यमाद्वारे पसरविण्यात येत होते त्यांनाही आळा बसला आहे. या चुकीच्या संदेशांबाबत ३४७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे . तसेच भादविच्या कलम १८० नुसार २३ हजार १२६ घटनांची नोंद झाली आहे.कोरोनासंदर्भात समाज माध्यमावर होत असलेल्या अपप्रचारास अटकाव करण्याचे निर्देश दिल्यामुळे यात एप्रिल फुलसारख्या संदेशांनाहीरोख लागला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAnil Deshmukhअनिल देशमुख