शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

Coronavirus : ...यापुढे लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 7:36 AM

Uddhav Thackeray : ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असे आपल्याला वागावे लागेल. यापुढे लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मांडली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी रविवारी राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

मुंबई : कामगारांच्या आरोग्याची काळजी घेऊन उद्योग सुरू करावेत. अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही. अनलॉक करताना आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत, त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक करायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन घेईल. ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असे आपल्याला वागावे लागेल. यापुढे लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मांडली.

मुख्यमंत्र्यांनी रविवारी राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले, असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे असल्याचे सांगतानाच आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, असे मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. युकेतील विषाणूसारखे किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करावे लागले, अन्यथा कोरोनाने आपल्याला नॉकडाऊन केले असते, अशा मोजक्या शब्दात मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या गांभीर्याबद्दल सांगितले.

आता आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको आहेत. यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, कामगारांचे लसीकरण करून घेणे, पाळ्यांमध्ये काम करणे, वर्क फ्राॅम होमला प्रोत्साहन देणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत. याशिवाय ज्या लोकांना कामावर येणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी ‘बायो-बबल’ तयार करावा. यात आवश्यक कामगारांना कामाच्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी. ज्याप्रमाणे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करून ठेवावे. यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

ऑक्सिजन आणताना उद्योजकांचे साहाय्यराज्यात १२०० मेट्रिक टन ऑक्सिजननिर्मिती होते. यातील काही उद्योगक्षेत्रांसाठी वापरले जाते. उद्योग क्षेत्राने सहकार्य केल्यामुळे हे सर्व ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरता आले. याशिवाय बाहेरील राज्यातून ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन आणण्यासाठीही उद्योजकांनी मदत केल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. सध्या राज्यात तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागू शकेल, असा अंदाज आहे. ही पूर्तता मिशन ऑक्सिजनअंतर्गत पूर्ण करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

बाहेरील कामगारांची नोंद ठेवाबाहेर राज्यातून येणाऱ्या कामगारांची नोंद ठेवण्यात यावी, तसेच बाहेर राज्यातून आल्यानंतर सात दिवस अलगीकरणात ठेवून त्यांची योग्य तपासणी झाल्यानंतरच त्यांना कामावर घ्यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.उद्योजकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणार - उद्योगमंत्री सुभाष देसाईलाॅकडाऊनमुळे उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी लघु व मध्यम उद्योगांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून सुविधा देण्यात येतील. मोठे उद्योग समूह आपल्या कामगारांसाठी उपाहारगृहाची सोय देऊ शकतात. मात्र, छोट्या उद्योजकांना ते शक्य नसते. अशांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून ५३ उपाहारगृहे चालविण्यात येणार आहेत. याशिवाय सार्वजनिक सुविधा केंद्र उभारणीसाठी शासनातर्फे जमीन उपलब्ध करून देण्यात येईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस