शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

CoronaVirus रक्तदात्यांनो! महाराष्ट्राला तुमची गरज आहे; उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 2:41 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढविण्याचे परिस्थीती पाहून ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले.

मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत अचानक वाढ झाली आहे. गरोदर कोरोनाग्रस्त महिलांचे नवजात बालक कोरोनामुक्त, ही आनंददायी बाब आहे. मात्र, या पुढची परिस्थिती आणखी बिकट होणार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदात्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढविण्याचे परिस्थीती पाहून ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यावरील पुढील संकटाची चाहूलही त्यांनी दिली. राज्यात जे बेड्स उपलब्ध करतोय, त्याठिकाणी जास्तीत जास्त ऑक्सिजनची सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, राज्यात पुन्हा एकदा रक्तदानाची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच पुढील ८ ते १० दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्याला येत्या काळात रक्ताची मोठी गरज लागणार आहे. यासाठी रक्तदान करणाऱ्यांनी मदतीसाठी पुढे यावं, असे आवाहन त्यांनी केले. उन्हाळी साथीपासून दूर राहिलो तसेच पावसाळी रोगापासून दूर राहण्याचा मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला. तसेच कोरोना विषाणूवर औषध नाही खरं असलं तरी रुग्णांना बरे करण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न आहे. ताप अंगावर काढू नका, थकवा जाणवतोय तर तात्काळ डॉक्टरांकडे जा, असे आवाहनही त्यांनी केले. शेवटच्या टप्प्यात आल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर येत असल्याचेही ते म्हणाले.

पुढचे दिवस धोक्याचे....कोरोना रुग्ण आणखी काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढणार असून गुणाकाराने कोरोना पसरणार आहे. लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवा, ज्या पद्धतीने हळूहळू लॉकडाऊन घालण्यात आला तसचं हळूहळू लॉकडाऊन उठवण्यात येईल. कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे, सोशल डिस्टेंसिंग पाळा, तोंडाला मास्क लावा, रस्त्यावर थुंकू नका, हात वारंवार स्वच्छ ठेवा हे करावं लागेल. कोरोनाकडे सकारात्मकदृष्टीने पाहा, आपण जगायचं कसं हे कोरोनामुळे शिकलो आहे. लॉकडाऊन एकदम उठवता येणार नाही, आयुष्याची गाडी हळूहळू रुळावर आणायची आहे. लॉकडाऊन शब्द न वापरता आम्ही काय काय सुरु करणार याची यादी देऊ, या गोष्टी सुरळीत राहण्याची जबाबदारी सरकारपेक्षा लोकांची जास्त आहे. पुढील काही दिवस धार्मिक, सामाजिक, सण-उत्सव घरातच साजरे करा, प्रत्येक धर्मातील लोकांनी आपापल्या ईश्वराकडे प्रार्थना करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Lockdown 4 : दीड महिन्याने यथेच्छ दारुचे प्राशन; घरी येताच मृत्यू

खतरनाक Video! अमेरिकेच्या नौदलाकडे नवे संहारक शस्त्र; दारुगोळ्याशिवाय विमान केले नष्ट

चीनची एकी! स्पर्धक असुनही शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो आले एकत्र

कर्मचाऱ्यांनो! पुढची १० वर्षे घरूनच काम करा, काही हरकत नाही; मार्क झकरबर्गची घोषणा

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBlood Bankरक्तपेढीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस