शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
6
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
7
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
8
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
9
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
10
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
11
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
12
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
13
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
14
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
15
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
16
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
17
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
18
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
19
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
20
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus भय इथले संपत नाही! आरोग्य सेवकांना अपुऱ्या सुरक्षेचे भय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 20:02 IST

जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील कोरोना कक्षात काम कऱणाऱ्या परिचारिकांनी मिळून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना लेखी निवेदन दिले आहे.

मुंबई - कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी व त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी फ्रंटलाइनवर डॉक्टरांसह अनेक आरोग्य सेवक काम करत आहेत. शासनाकडून वेळोवेळी या पॅरावैद्यकीय व चतुर्थ श्रेणी कामगारांना मास्क व पीपीई कीट पुरविल्याचे सांगितले जात आहे. मात्र शहर उपनगरातील पालिकेच्या विविध रुग्णालयांत काम करणाऱ्या आरोग्य सेवकांना कोणतेही सुरक्षा कवच नसल्याचे वारंवार समोर येत आहे. अहोरात्र कर्तव्य बजावताना सुरक्षेच्या अभावामुळे अजूनही आऱोग्यसेवकांच्या मनातील भय कायम असल्याची भावना आहे. त्यामुळे शासनाने या रुग्णालयीन आऱोग्य सेवकांना तातडीने सुरक्षा पुरवावी मागणी आहे.


जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील कोरोना कक्षात काम कऱणाऱ्या परिचारिकांनी मिळून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात रुग्णालयाच्या कोरोना कक्षात येणाऱे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे, मात्र असे असूनही परिचारिकांना मास्क, हँडग्लोव्ह्ज मिळत नसल्याची तक्रार केली आहे. उपचार करण्याची तयारी आहे, मात्र सुरक्षेसाठी त्वरित व्यवस्था करा अशी मागणी केली आहे. यापूर्वी कस्तुरबा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी व अन्य कामगारांनी मिळून रुग्णालय प्रशासनाकविषयी नाराजी व्यक्त केली होती. याविषयी, म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रदीप नारकर यांनी सांगितले की, कोरोना विषाणू बाधित रुग्ण आणि संशयित रुग्ण यांना सेवा देणाऱ्या चतुर्थश्रेणी कामगार-सफाईगार, कक्ष परिचर आणि परिचारिका यांना रुग्णालय प्रशासनाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रभाकर नारकर यांनी सांगितले. त्यांना पीपीई किट उपलब्ध होत नसल्यामुळे सेवा देणारे कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य सुरक्षा धोक्यात आले आहे.


रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवत नसल्याचा फटका नायर रुग्णालयातील परिचारिका व कर्मचाऱ्यांना बसला आहे. नायर रुग्णालयात कोरोना रुग्णाचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने हालचाल करुन परिचारिका व कर्मचाऱी असे मिळून १७ जणांना घरगुती अलगीकरण (होम क्वारंटाइन) केले आहे. हिंदुजा रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर जवळपास ८७ जणांना होम क्वारंटाइन केले होते. त्याचप्रमाणे, जसलोकच्या परिचारिकेलाही प्रवासाचा इतिहास नसताना कोरोनाची लागण झाली आहे. एकंदरित, कोरोनावर विजय मिळविण्याच्या प्रक्रियेतील डॉक्टरप्रमाणेच आऱोग्यसेवकही प्रमुख योद्धे आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षाकवच मिळणे हा त्यांचा हक्क आहे, तसे न झाल्यास कोरोनाची दहशत आणखी पसरण्याचा धोका आहे हे शासनाने ओळखले पाहिजे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस