शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : चिंता करू नका, राज्याकडे सहा महिने पुरेल एवढा धान्यसाठा - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 16:53 IST

अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल या भीतीने अनेकजण जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत  आहेत. तसेच भाजीपाल्याच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या आणीबाणीच्या परिस्थितीत अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल या भीतीने अनेकजण जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत  आहेत. तसेच भाजीपाल्याच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. राज्यातील नागरिकांनी अन्नधान्याची चिंता करू नये. भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी करू नका, असे आवाहन भुजबळ यांनी केले. 

अन्नधान्य, भाजीपाला ही अत्यावश्यक बाब आहे त्यामुळे त्याच्या पुरवठ्यात खंड पडणार नाही. तसेच बाजार समित्याही बंद पडणार नाहीत. पोलिसांनी माथाडी कामगार आणि शेतकऱ्यांना समजून घ्यावे, मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सहकुटुंब बाहेर पडायची गरज नाही. एका व्यक्तीने जाऊन खरेदी करून यावी, तसेच बाजारातही गर्दी करू नये, असे भुजबळ म्हणाले.दरम्यान, चिकन, मटण, मासे यांच्या विक्रीसही परवानगी आहे. त्यामुळे त्यखवरही बंधने येणार नाहीत. मात्र सर्वांनी तारतम्य बाळगावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसChagan Bhujbalछगन भुजबळMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार