शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Coronavirus: राज्यात आतापर्यंत कोरोनाचे १ लाख ५९ हजार रुग्ण; दिवसभरात ५,३१८ रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 3:16 AM

मुंबईत दिवसभरात १ हजार ४०२ रुग्णांचे निदान झाले, तर ४१ मृत्यू झाले. त्यामुळे रुग्णसंख्या ७४ हजार २५२ झाली असून मृत्यू ४ हजार २८४ झाले आहेत.

मुंबई : राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत. मागील काही दिवसांत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून हे प्रमाण आता ५२.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यूदर ४.५७ टक्के आहे.

राज्यात ६७ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी नोंद झालेल्या १६७ मृत्यूंपैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांत झाले आहेत. उर्वरित ८१ मृत्यू मागील काळातील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६४, जळगाव ५, धुळे ४, अहमदनगर २, नाशिक २, वसई विरार १, पिंपरी-चिंचवड १, जालना १ आणि लातूर १ यांचा समावेश आहे.

अन्य राज्य किंवा देशातील ७२ रुग्णराज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने १ लाख ५९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात अन्य राज्य वा देशातील ७२ कोरोना रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत २३ बाहेरील रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर ४९ सक्रिय रुग्ण आहेत.८४,२४५ जण झाले बरेदिवसभरात ४,४३० रुग्ण बरे झाले असून राज्यात आतापर्यंत ८४,२४५ जण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६५ हजार १६१ जण होम क्वारंटाईन आहेत, तर ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.मुंबईत कोरोनामुळे आणखी ४१ बळी

मुंबईत दिवसभरात १ हजार ४०२ रुग्णांचे निदान झाले, तर ४१ मृत्यू झाले. त्यामुळे रुग्णसंख्या ७४ हजार २५२ झाली असून मृत्यू ४ हजार २८४ झाले आहेत. सध्या मुंबईत २७ हजार ६३१ सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत ४२ हजार ३२९ रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १७.७४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस