शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कोरोनाशी दिवसरात्र लढताना पोलिसांना पण हवे " विमा कवच "

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 13:40 IST

कोरोना विषाणूविरोधातल्या या लढ्यात रस्त्यावरच्या पोलिसांनाच या विषाणूने गाठले तर काय, याचे उत्तर मात्र समाधानकारक नाही.

ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे द्या सुरक्षा योजना कामांचे तास कमी करण्याची मागणी  

कल्याणराव आवताडे - पुणे : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन, चेहऱ्याला मास्क लावून पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेल्या हद्दीत गेल्या आठवडाभरापासून नाकाबंदी करीत आहेत. ही नाकाबंदी कोण्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी किंवा दंगेखोरांना आळा घालण्यासाठी नाही. पोलिसांचा यावेळचा लढा एका न दिसणाºया विषाणूविरोधात आहे. या विषाणूचा संसर्ग पसरू नये, म्हणून नागरिकांना रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी पोलीस रस्त्यावर उभे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ज्या विषाणूच्या उद्रेकाला महामारी जाहीर केले, त्या विषाणूविरोधात लढताना पोलीस मात्र कोणतेही कवच न घेताच लढत आहेत. कोरोना विषाणूविरोधातल्या या लढ्यात रस्त्यावरच्या पोलिसांनाच या विषाणूने गाठले तर काय, याचे उत्तर मात्र समाधानकारक नाही.कारण कोरोनाने गाठल्यानंतर मृत्यू झाल्यास कुटुंबाला साह्य करणारे कवच नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोनाविरोधात लढणाºया आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाने नुकतेच ५० लाखाचे विमा कवच जाहीर केले. इतर आवश्यक वैद्यकीय साधनेही त्यांना दिली गेली आहेत. कोरोनाविरोधात लढणाऱ्या पोलिसांनाही हे संरक्षण मिळावे, अशी पोलिसांची अपेक्षा आहे. कोरोना साथ पसरू नये, म्हणून रस्त्यावर असणाºया पोलिसांनाही कोरोनाच्या संसर्गाची भीती आहे. तरीही ही मंडळी अहोरात्र रस्त्यावर आहेत. यासंदर्भातील व्यथा पोलिसांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. कोरोनाजन्य साथ आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधानांनी राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही अनेक नागरिक बिनकामाचे रस्त्यावर येत आहेत. या रिकामटेकड्यांना आवरण्यासाठी पोलिसांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. मात्र कर्तव्य बजावत असताना कोरोनापासून वाचण्यासाठी कापडी मास्कशिवाय पोलिसांकडे काहीच नाही. कोरोनाची लागण एखाद्या पोलिसाला झाल्यास, ती त्याच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबीयांपर्यंत, पोलीस वस्त्यांमध्येही पोहोचण्याचा धोका आहे. काही विपरित घडल्यास त्याला विम्याचे संरक्षण आवश्यक आहे.कोरोनाबाधित अथवा संशयित अशा सर्व व्यक्तींशी आम्हा पोलिसांचा थेट संपर्क होत असल्याने आम्हाला विमा कवच आवश्यक असल्याची भावना एका पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली. त्यांनी सांगितले, की सध्या पोलीस महत्त्वाच्या चौकात, रस्त्यावर नाकाबंदी करून नागरिकांची चौकशी करून मगच त्यांना सोडतात. आम्ही पोलीस घरी गेल्यावर मात्र वेगळ्या खोलीत राहतो. वेगळे जेवतो कारण आमच्यामुळे आमचे कुटुंबीय धोक्यात येण्याची भीती असते, असे पोलिसांनी सांगितले........................कामांचे तास कमी करण्याची मागणी  कोरोना विषाणूला रोखण्यासाठी दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी विशेष सेल आणि गुन्हे शाखेसह सर्व युनिटममधील ५० आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना रजेवर पाठविण्याचे आदेश दिले. पुढील आदेश येईपर्यंत त्यांना घरीच विश्रांती घेण्यास सांगितले.  युनिटमधील उर्वरित पोलिसांनी अत्यंत काळजी घेऊन १०-१० दिवस वैकल्पिक कर्तव्य बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या. म्हणजेच, एक पोलीस महिन्यात २० दिवस ड्यूटी करेल. तसेच पोलीस ठाण्यांमध्ये तैनात असलेल्या २५ टक्के पोलिसांना रजा देण्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यामध्ये लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस अधिकाऱ्यांना सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत नाकाबंदी देण्यात आली आहे. यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कामांचे तास कमी करून दिल्ली पोलिसांच्या धर्तीवर पुण्यातही पोलिसांच्या कामाचे नियोजन करावे, अशी मागणी पोलिसांनी ‘लोकमत’कडे केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAnil Deshmukhअनिल देशमुखdoctorडॉक्टरFamilyपरिवार