शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
8
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
9
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कोरोनाशी दिवसरात्र लढताना पोलिसांना पण हवे " विमा कवच "

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 13:40 IST

कोरोना विषाणूविरोधातल्या या लढ्यात रस्त्यावरच्या पोलिसांनाच या विषाणूने गाठले तर काय, याचे उत्तर मात्र समाधानकारक नाही.

ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे द्या सुरक्षा योजना कामांचे तास कमी करण्याची मागणी  

कल्याणराव आवताडे - पुणे : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन, चेहऱ्याला मास्क लावून पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेल्या हद्दीत गेल्या आठवडाभरापासून नाकाबंदी करीत आहेत. ही नाकाबंदी कोण्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी किंवा दंगेखोरांना आळा घालण्यासाठी नाही. पोलिसांचा यावेळचा लढा एका न दिसणाºया विषाणूविरोधात आहे. या विषाणूचा संसर्ग पसरू नये, म्हणून नागरिकांना रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी पोलीस रस्त्यावर उभे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ज्या विषाणूच्या उद्रेकाला महामारी जाहीर केले, त्या विषाणूविरोधात लढताना पोलीस मात्र कोणतेही कवच न घेताच लढत आहेत. कोरोना विषाणूविरोधातल्या या लढ्यात रस्त्यावरच्या पोलिसांनाच या विषाणूने गाठले तर काय, याचे उत्तर मात्र समाधानकारक नाही.कारण कोरोनाने गाठल्यानंतर मृत्यू झाल्यास कुटुंबाला साह्य करणारे कवच नसल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोनाविरोधात लढणाºया आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाने नुकतेच ५० लाखाचे विमा कवच जाहीर केले. इतर आवश्यक वैद्यकीय साधनेही त्यांना दिली गेली आहेत. कोरोनाविरोधात लढणाऱ्या पोलिसांनाही हे संरक्षण मिळावे, अशी पोलिसांची अपेक्षा आहे. कोरोना साथ पसरू नये, म्हणून रस्त्यावर असणाºया पोलिसांनाही कोरोनाच्या संसर्गाची भीती आहे. तरीही ही मंडळी अहोरात्र रस्त्यावर आहेत. यासंदर्भातील व्यथा पोलिसांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. कोरोनाजन्य साथ आटोक्यात आणण्यासाठी पंतप्रधानांनी राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही अनेक नागरिक बिनकामाचे रस्त्यावर येत आहेत. या रिकामटेकड्यांना आवरण्यासाठी पोलिसांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. मात्र कर्तव्य बजावत असताना कोरोनापासून वाचण्यासाठी कापडी मास्कशिवाय पोलिसांकडे काहीच नाही. कोरोनाची लागण एखाद्या पोलिसाला झाल्यास, ती त्याच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबीयांपर्यंत, पोलीस वस्त्यांमध्येही पोहोचण्याचा धोका आहे. काही विपरित घडल्यास त्याला विम्याचे संरक्षण आवश्यक आहे.कोरोनाबाधित अथवा संशयित अशा सर्व व्यक्तींशी आम्हा पोलिसांचा थेट संपर्क होत असल्याने आम्हाला विमा कवच आवश्यक असल्याची भावना एका पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली. त्यांनी सांगितले, की सध्या पोलीस महत्त्वाच्या चौकात, रस्त्यावर नाकाबंदी करून नागरिकांची चौकशी करून मगच त्यांना सोडतात. आम्ही पोलीस घरी गेल्यावर मात्र वेगळ्या खोलीत राहतो. वेगळे जेवतो कारण आमच्यामुळे आमचे कुटुंबीय धोक्यात येण्याची भीती असते, असे पोलिसांनी सांगितले........................कामांचे तास कमी करण्याची मागणी  कोरोना विषाणूला रोखण्यासाठी दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी विशेष सेल आणि गुन्हे शाखेसह सर्व युनिटममधील ५० आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना रजेवर पाठविण्याचे आदेश दिले. पुढील आदेश येईपर्यंत त्यांना घरीच विश्रांती घेण्यास सांगितले.  युनिटमधील उर्वरित पोलिसांनी अत्यंत काळजी घेऊन १०-१० दिवस वैकल्पिक कर्तव्य बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या. म्हणजेच, एक पोलीस महिन्यात २० दिवस ड्यूटी करेल. तसेच पोलीस ठाण्यांमध्ये तैनात असलेल्या २५ टक्के पोलिसांना रजा देण्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यामध्ये लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस अधिकाऱ्यांना सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत नाकाबंदी देण्यात आली आहे. यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कामांचे तास कमी करून दिल्ली पोलिसांच्या धर्तीवर पुण्यातही पोलिसांच्या कामाचे नियोजन करावे, अशी मागणी पोलिसांनी ‘लोकमत’कडे केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAnil Deshmukhअनिल देशमुखdoctorडॉक्टरFamilyपरिवार