शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; दिवसभरात १४,१६१ नव्या रुग्णांची नोंद, ३३९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 21:44 IST

राज्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २१ हजार ६९८ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  राज्यात शुक्रवारी १४ हजार १६१ नवे रुग्ण सापडले. तर दिवसभरात ३३९ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ७१.३९ टक्के आहे. 

राज्यात १ लाख ६४ हजार ५६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २१ हजार ६९८ जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर, राज्यात ११ लाख ९२ हजार ६८५ रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर ३५ हजार १३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यात ३२६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४२, ठाणे १७, नवी मुंबई मनपा ११, कल्याण डोंबिवली मनपा ७, वसई विरार मनपा५, पालघर ११, नाशिक १६, पुणे ६३, पिंपरी चिंचवड मनपा १८, सोलापूर ८, सातारा १३, कोल्हापूर २०, सांगली १२, नागपूर १७ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३३९ मृत्यूंपैकी २६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१ मृत्यू पुणे १०, ठाणे ९, नाशिक ३, अहमदनगर २, कोल्हापूर २, नंदुरबार १, सांगली १, सातारा १, सोलापूर १ आणि पालघर १ असे आहेत. आज ११,७४९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,७०,८७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात ११ हजार ७४९ रुग्ण बरेदिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ४ लाख ७० हजार ८७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.३० टक्के एवढा आहे.

मुंबईत २४ तासांत १,४०६ नव्या रुग्णांची वाढ, ४२ जणांचा मृत्यू!मुंबई गेल्या २४ तासांत १ हजार ४०६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनोबाधितांची संख्या १ लाख ३४ हजार २२३ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ७ हजार ३५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत मुंबईत १२३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत १ लाख ८ हजार २६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र