शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो; नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 15:12 IST

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देफडणवीसांप्रमाणे उद्धव ठाकरे न्यायाधीश नाहीत - नाना पटोलेभ्रष्टाचारीच आमच्यावर आरोप करतायत - नाना पटोलेसगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो - नाना पटोले

मुंबई : परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत. भाजप आणि अन्य पक्ष महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधत आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सगळं विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं, असं नाना पटोले म्हणाले. (congress leader nana patole replied on devendra fadnavis statement)

नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे. काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावे, असे म्हटले होते. यावर, या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण देश विकून ते चालवणारी लोकं काँग्रेसला वाट्याचे सांगत असतील, तर फडणवीस सरकारमध्ये झालेली पापं राज्य सरकारने उघड करावीत. परमबीर सिंग कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांना माहिती आहे. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती, असा पलटवार नाना पटोले यांनी केला. 

लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सवाल

RSS ला कसा वाटा पुरवला गेला 

आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, काँग्रेसने देशाला उभं केलं आहे. वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलं आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले.

भ्रष्टाचारीच आमच्यावर आरोप करतायत

ज्या लोकांचे हात भ्रष्टाचारात गुंतले आहेत, तेच लोकं आता आमच्यावर आरोप करत आहेत. शेतकरी आंदोलन, लसीकरणापासून वंचित भारतीय, महागाई मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी ही व्यूहरचना रचली आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. राज्यपालांची भूमिका संशयास्पद असून,  राजभवन भाजप कार्यालय झालं आहे. त्यांनी काय रिपोर्ट द्यावा हा त्यांचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो ठेका घेतला आहे त्यासाठी जनता माफ करणार नाही, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.

आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार; नारायण राणेंचा दावा

फडणवीसांप्रमाणे उद्धव ठाकरे न्यायाधीश नाहीत

परमबीर सिंग दोषी आहेत की, अनिल देशमुख हे पाहावे लागेल. फडणवीसांप्रमाणे उद्धव ठाकरे न्यायाधीश नाहीत. फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायाधीशाची भूमिका निभावत होते. त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर ते क्लीन चीट द्यायचे. त्यावेळी का राजीनामा घेतले नाहीत, अशी विचारणा करत राजकारणात आरोप होत असतात पण सत्यता समोर येईपर्यंत राजीनामा घेणे चुकीचे आहे, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसBJPभाजपा