शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राज्यात ढगफुटीच्या घटनांमध्ये येत्या काळात आणखी वाढ होणार : हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 6:07 PM

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या १०० वर्षांमध्ये कधी झाला नाही असा ढगफुटीसारखा पाऊस कोल्हापूर भागात झाला आहे

ठळक मुद्देगावपातळीवर पर्जन्यमापक बसविण्याची गरज 

पुणे : यावर्षी राज्यात ढगफुटीच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळते आहे. वातावरणात असलेल्या अस्थिरतेमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास देखील लांबणार आहे. महाराष्ट्रात जागोजागी ढगफुटी म्हणजे ताशी १०० मिलीमीटर दराचा पाऊस दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील होत आहे. मात्र पावसाच्या प्रमाणात व सध्याच्या ढगफुटीच्या घटनांच्या तुलनेत आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ प्रा.किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.

प्रा. किरणकुमार जोहरे हे ढगफुटी तज्ज्ञ म्हणून प्रचलित आहे. तसेच त्यांनी ४ ऑक्टोबर २०१० रोजी पुण्यातील पाषाण येथे ढगफुटी होण्याआधी प्रशासनाला कळवून शेकडो लोकांचे प्राण वाचविले होते. जोहरे यांनी भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्राॅपीकल मेटीओराॅजी (आयआयटीएम) येथे बारा वर्षापेक्षा अधिककाळ शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे. 

जोहरे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात गेल्या १०० वर्षांमध्ये कधी झाला नाही असा ढगफुटीसारखा पाऊस कोल्हापूर भागात झाला आहे.तसेच सोलापूर, सांगली, सातारा इथे देखील ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे. तसेच पुणे व अहमदनगर जिल्ह्यात देखील ६ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी रात्री या वेळेत विखुरलेल्या स्वरुपात ढगफुटी सारखा पाऊस झाला. अहमदनगरमध्ये या महिन्याच्या ३ तारखेला सायंकाळी साडे ५ ते साडे ६ या कालावधीत ढगफुटी झाली व मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले व शेकडो वाहने वाहून गेली.  मराठवाड्यातील जालना जिल्हयात सोमवारी ( दि. ७) सायंकाळी ४ ते ५.३० या अवघ्या दीड तासात ५६ मिलीमीटर असा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत ढगफुटीसारखा पाऊस होत आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्य़ातील दिंडोरी तालुक्यातील अनेक गावात रविवारी ( दि.६) दुपारी एक ते चार या वेळात विखुरलेल्या स्वरुपात ढगफुटीसारखा पाऊस झाला.

गावपातळीवर पर्जन्यमापक बसविण्याची गरज मान्सूनमध्ये दिवसेंदिवस लक्षणीयरित्या बदल होतो आहे. त्याचाच परिणाम म्हणजे हवामान खात्याने पावसाविषयीचे वर्तवलेले अंदाज देखील बऱ्याचवेळा फोल ठरतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळणे कठीण जाते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका तसेच गाव पातळीवर पर्जन्यमापक यंत्र बसविल्यामुळे पावसातील बदलांची योग्य नोंद गाव पातळीवर घेतली जाऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. यामुळे गावपातळीवर पर्जन्यमापक बसविण्याची गरज आहे. 

हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्य़ातील गावात पर्जन्यमापक बसविण्यासाठी गावकऱ्यांनीच पुढाकार घ्यावा व आपल्या गावातील पाऊस मोजत त्याच्या नोंदी स्वतः ठेवाव्यात असे आवाहन हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी केले आहे. गावात पर्जन्यमापक कसे बनवायचे हे गावकऱ्यांनीच स्वतः शिकून घ्यावे तसेच शाळाकाॅलेजच्या विद्यार्थ्यांना देेखील ते बनविता येतील इतके सोपे आहे.  

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊसFarmerशेतकरी