शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

‘धोरण बदलल्याने जलप्रदूषण वाढणार’

By admin | Updated: February 25, 2015 02:36 IST

नदी धोरणानुसार नद्यांपासून ३ किलोमीटरपर्यंत औद्योगिक विकास करू नये, अशी अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने नदी

मुंबई : नदी धोरणानुसार नद्यांपासून ३ किलोमीटरपर्यंत औद्योगिक विकास करू नये, अशी अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने नदी परिसरात उद्योग सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाणे, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणारी धरणेही धोक्यात येतील, अशी भीती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ते म्हणाले, नदी धोरणात बदल केल्यामुळे कालपर्यंत ज्या मुळशी धरणाकडे हिल स्टेशन उभारण्यास परवानगी मिळत नव्हती ती आता सहज मिळेल. कोणत्या उद्योगपतींना फायदा होण्यास या धोरणात बदल केला, असा प्रश्न उपस्थित करतानाच हा बदल तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी करण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. मात्र प्रत्यक्षात भूमिपूजन झाले नाही. अशा प्रकारे शिवरायांच्या नावाने सत्ता मिळवून या शासनाने शिवरायांचा अवमान केला आहे. रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मदर तेरेसा यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यामुळे त्यांचा निषेध करावा तितका थोडा आहे, असेही विखे-पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)