शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यातीचे धोरण बदलून दाखवावे

By admin | Updated: September 16, 2014 02:42 IST

मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असताना शेतक:यांच्या हिताची जपणूक करणारी मंडळी कोठे आहेत,

कोल्हापूर : तत्कालीन संयुक्त पुरोगामी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी कधी घातली नाही, घातली तर चोवीस तासांत उठविण्याचे काम केले; पण मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असताना शेतक:यांच्या हिताची जपणूक करणारी मंडळी कोठे आहेत, त्यांनी हा निर्णय बदलून दाखवावाच, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगळवारी कोल्हापुरात होणा:या प्रचार प्रारंभ मेळाव्यासाठी पवार आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
साखर दर घसरल्याने आगामी हंगामात साखर कारखान्यांसमोर अडचणी वाढणार आहेत, अशा परिस्थितीत संसदेत निर्णय बदलण्याचे काम सत्ताधारी मंडळींनी केले पाहिजे; पण काही मंडळी संसदेऐवजी बारामती व कोल्हापुरातच निर्णय बदलतात, असे वाटते असा टोलाही त्यांनी शेट्टींना लगावला. दोन्ही काँग्रेसचे जागावाटप संपले की, समविचारी पक्षांशी चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. 
ठीक राहायचे असेल तर कोल्हापुरातच यावे लागते
कोल्हापुरातून प्रचार प्रारंभाचे रहस्य विचारले असता, पवार म्हणाले, गेल्या 35 वर्षात माङया प्रत्येक निवडणुकीची सुरुवात कोल्हापुरातून करतो. हे माङो आजोळ असल्याने आवडते असेल हा भाग वेगळा आहे; पण रस्ता ठीक असेल तर येथील जनता पाठीशी राहते, जर ठीक नसेल तर जागाही दाखविते. त्यामुळे ठीक राहण्यासाठी कोल्हापुरात यावेच लागते. 
आर.आर यांच्या विजयाबद्दल शंका नाही
गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या विजयाबद्दल माङया मनात कोणतीही शंका नाही. जे लोक आज त्यांच्याविरोधात उतरले आहेत, त्यांच्याशी टक्कर देऊनच ते राजकारणात मोठे झाले असल्याने तासगाव मतदारसंघातील जनता या निवडणुकीतही त्यांनाच बळ देईल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी) 
 
बारामतीचा टोल रद्द झाला कारण त्यांनी संबंधित रस्ते विकास कंपनीला नगरपालिकेच्या मालकीची वीस एकर जागा दिली. जे रस्ते नगरपालिका अथवा महापालिकेने स्वत: ठराव करून केले आहेत, रस्त्यांच्या खर्चाचे उत्तरदायित्व त्यांच्यावरच येते. त्यामुळे तसा काय तोडगा कोल्हापूरच्या टोलप्रश्नात काढता येईल का, याचा विचार जरूर करता येईल. या प्रश्नात लक्ष द्यायला मला आनंदच वाटेल; परंतु त्यासाठी आमचे सरकार येऊन तसा अधिकार आम्हाला मिळाला तर अत्यानंद वाटेल, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.
 
हसन मुश्रीफ यांनी टोल पंचगंगा नदीत बुडविण्याची घोषणा केली; परंतु तो रद्द झाला नाही. यामुळे लोकांत नाराजी असून, त्यांनी आंदोलन सुरू केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले,‘टोल विरोधी कृती समितीचे निवेदन दोनच दिवसांपूर्वी फॅक्सवर मिळाले. परंतु याबाबत कृती समितीच्या प्रतिनिधींनी माङयाशी चर्चा केलेली नाही, असे ते म्हणाल़े