शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्जमाफीसाठी राज्यपालांना रक्तरंजीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 14:51 IST

सरसकट कर्जमाफीसाठी लिहिलेली पत्रं घेऊन भाजपचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी ही पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केली जाणार आहेत. 

मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी देऊ केली आहे. या कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र भाजपने ही कर्जमाफी फसवी असल्याचा दावा केला आहे. या कर्जमाफीवरून भाजप आक्रमक झाले असून राज्यपालांना शेतकऱ्यांच्या सरकट कर्जमाफीसाठी 50 हजार पत्र लिहिण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 50 हजार पत्र राज्यपालांना लिहिण्यात आली आहेत. यापैकी काही पत्र शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. ही पत्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राज्यपालांकडे सोपविली जाणार आहेत.

सरसकट कर्जमाफीसाठी लिहिलेली पत्रं घेऊन भाजपचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी ही पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केली जाणार आहेत. 

तत्पूर्वी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील कर्जमाफी झालेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापुढील याद्या लवकरच येणार आहेत. तर ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे.