शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

सरसकट कर्जमाफीसाठी राज्यपालांना रक्तरंजीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 2:49 PM

सरसकट कर्जमाफीसाठी लिहिलेली पत्रं घेऊन भाजपचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी ही पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केली जाणार आहेत. 

मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी देऊ केली आहे. या कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र भाजपने ही कर्जमाफी फसवी असल्याचा दावा केला आहे. या कर्जमाफीवरून भाजप आक्रमक झाले असून राज्यपालांना शेतकऱ्यांच्या सरकट कर्जमाफीसाठी 50 हजार पत्र लिहिण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 50 हजार पत्र राज्यपालांना लिहिण्यात आली आहेत. यापैकी काही पत्र शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. ही पत्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राज्यपालांकडे सोपविली जाणार आहेत.

सरसकट कर्जमाफीसाठी लिहिलेली पत्रं घेऊन भाजपचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी ही पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केली जाणार आहेत. 

तत्पूर्वी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील कर्जमाफी झालेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापुढील याद्या लवकरच येणार आहेत. तर ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे.