शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा वर्षपूर्ती स्वबळावर करणार

By admin | Updated: October 16, 2015 03:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ३१ आॅक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.

यदु जोशी, मुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ३१ आॅक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ‘नो सेलीब्रेशन, ओन्ली कम्युनिकेशन’ असे सूत्र ठरविण्यात आले असले तरी याबाबत शिवसेनेशी कसलेही ‘कम्युनिकेशन’ झालेले नाही. शिवसेनेला बाजूला ठेवूनच वर्षपूर्ती साजरी करण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली व पाकचे माजी विदेशमंत्री कसुरी यांच्या कार्यक्रमावरून भाजपा-शिवसेनेचे संबंध आधीच ताणले गेले असताना आता सरकारच्या वर्षपूर्ती समारंभापासून सेनेला दूर ठेवून भाजपाने आणखी एक खेळी केली आहे. ३१ आॅक्टोबरला सरकारचा शपथविधी झाला असला तरी केवळ भाजपाच्या मंत्र्यांनी शपथ घेतली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांनी डिसेंबरमध्ये शपथ घेतली होती. त्याअर्थी ही फक्त भाजपा मंत्र्यांचीच वर्षपूर्ती आहे. मुंबई भाजपाच्या कार्यालयात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे आदींच्या उपस्थितीत पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक झाली. वर्षभरात आपण अनेक निर्णय घेतले ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन मुख्यमंत्री आणि दानवे यांनी केले. भाजपाने वर्षपूर्ती स्वबळावर करण्याचे ठामपणे ठरविले असून त्यासाठी दानवे यांच्या अध्यक्षतेखाली ११ नेत्यांची एक समिती आजच्या बैठकीत जाहीर करण्यात आली. १९ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबर आणि त्यानंतर दहा दिवस सरकारची कामगिरी जनमानसात पोहोचविण्यासाठी भाजपातर्फे जाहीर सभा, प्रत्येक गावातील निवडक लोकांशी संवाद, पत्रके, माहिती पुस्तकांचे वाटप, घरोघरी जावून निर्णयांची माहिती देणे, सर्व जिल्ह्णांच्या ठिकाणी पत्रपरिषदा असा धडाका लावला जाणार आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले की, वर्षपूर्तीनिमित्त केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता आमचे कार्यकर्ते संवादाचा व्यापक कार्यक्रम राबवतील. शासकीय योजनांचा अभ्यास असलेले पक्षाचे प्रशिक्षित कार्यकर्ते राज्यभर जातील. >> सरकारने काय केले? आपल्या सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले पण ते अद्याप जनतेपर्यंत नीट पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे तुमच्या सरकारने काय काम केले, असे लोक आम्हाला विचारतात. असा सूर भाजपाच्या आमदारांनी आज पक्षाच्या बैठकीत लावला. संघटना आणि सरकार यांच्यात समन्वय हवा तसा दिसत नसल्याची तक्रारही अनेकांनी केली, असे सूत्रांनी सांगितले.