शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

'बिनकामाची पन्नाशी'; भाजपकडून ठाकरे सरकारवर 'सोशल अटॅक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 17:10 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाने महाविकास आघाडीच्या सरकारवर 'बिनकामाची पन्नाशी' अशा शब्दांत घणाघाती टीका केली आहे.

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आज 50 दिवस झाले आहेत. तर याच मुद्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने सोशल मिडियावरून ठाकरे सरकार आणि फडणवीस सरकारने केलेल्या सुरवातीच्या 50 दिवसांच्या कामांचा आलेख दाखवत, 50 दिवस महा‘भकास’आघाडीचे अशा शब्दात टीका केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाने महाविकास आघाडीच्या सरकारवर 'बिनकामाची पन्नाशी' अशा शब्दांत घणाघाती टीका केली आहे. यावेळी माजी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची सरकार स्थापन झाल्यावर सुरवातीच्या 50 दिवसात घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामांचा उल्लेख केला गेला आहे.

तर दुसऱ्या बाजूला मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 50 दिवसात शासकीय योजनांना दिलेल्या स्थगितीचा उल्लेख करण्यात आला आहे. तर आत्ताच सरकार म्हणजे फक्त स्थगिती सरकार असल्याची टीका करण्यात आली आहे.

ठाकरे सरकारच्या नेत्यांचे 50 दिवस हे फक्त मंत्रिमंडळ विस्तार, खाते,बंगले,दालन यासाठी घेतलेल्या बैठकीतच गेल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर नगरविकास खात्याचे कामे, ग्रामविकास खात्याचे कामे, जलयुक्त शिवार आणि इतर कामांना स्थगिती देऊन, हे सरकार गेल्या 50 दिवसात फक्त स्थगिती सरकार ठरला असल्याचा सुद्धा आरोप भाजपने केला आहे.