शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

"जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 11:19 IST

येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्यातील सरकार सुरळीतपणे चालले पाहिजे ही भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे. हीच भावना भाजपाचीही आहे. पण काही दिवसांआधी असे घटनाक्रम होत राहिले. त्यातून काही ना काही विषय पुढे जात राहिले असं चव्हाण यांनी सांगितले. 

सिंधुदुर्ग - नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना आणि भाजपा यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. त्यात शिंदेसेनेचे अनेक पदाधिकारी भाजपात घेतले जात असल्याने रवींद्र चव्हाण यांच्यावर शिंदेसेनेने आगपाखड केली होती. मात्र आता महायुतीतील वाद मिटवण्यासाठी लवकरच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकत्रित चर्चा करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी चव्हाणांशी संपर्क साधून वादावर पडदा टाकला पाहिजे असं म्हटलं आहे. सिंधुदुर्गात घेतलेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण यांनी महायुतीतील वादावर भाष्य केले.

रवींद्र चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. त्यापैकी काही निवडणुका पूर्ण झाल्यात. काही ठिकाणी अजूनही निवडणुका बाकी आहे. निवडणूक प्रचारात अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात. ते होणं स्वाभाविक असते. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही महायुतीत एकत्रपणे सत्तेत गेली वर्षभरापासून चांगली कामे करतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्यातील सरकार सुरळीतपणे चालले पाहिजे ही भावना महाराष्ट्रातील जनतेची आहे. हीच भावना भाजपाचीही आहे. पण काही दिवसांआधी असे घटनाक्रम होत राहिले. त्यातून काही ना काही विषय पुढे जात राहिले असं त्यांनी सांगितले. 

तसेच महायुतीतील नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कालच चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी विषय अधिक वाढवू नये असं सांगितले. त्यावर काय करावे असं मी विचारले. त्यामुळे लवकरच आम्ही सर्व जण देवेंद्र फडणवीस, मी आणि ते एकत्रित बसणार आहोत. जे घडलंय त्यावर आपण पडदा टाकला पाहिजे असं शिंदेंनी म्हटलं. त्यामुळे कल्याण डोंबिवली हा जो अतिशय संवेदनशील भाग आहे. त्या भागात काही पक्षप्रवेश झाले. शिवसेनेत काही प्रवेश घेतले, त्यानंतर भाजपानेही प्रवेश घेतले. युवा नेते अभिजीत थरवळ यांच्या पक्षप्रवेशानंतर अधिक तीव्रता जाणवली. कल्याण डोंबिवली, उल्हासनगर येथे जे पक्षप्रवेश झाले त्यात दोन्ही बाजूने आक्षेप घेण्यात आले. त्यावर वरिष्ठ मंडळी सर्वजण एकत्र बसण्याचं ठरवलेले आहे. त्यावर १०० टक्के चर्चा होईल अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.

दरम्यान, तूर्तास या सर्व गोष्टींवर पडदा पडला पाहिजे. यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील सर्व भागात भाजपा आणि शिवसेना यांच्यात आपापसातील नेते पक्षात घेऊ नये असा निर्णय सध्या झाला आहे. लवकरच अधिवेशन काळात कधीतरी एक दिवस एकत्र बसून चर्चा होईल. महाराष्ट्राला येणाऱ्या काळात गतिमान करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जे काही आवश्यक असेल ते करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला आहे असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं.  

English
हिंदी सारांश
Web Title : Eknath Shinde, Ravindra Chavan to resolve alliance dispute soon.

Web Summary : Ravindra Chavan clarified that Eknath Shinde contacted him to resolve the dispute within the Mahayuti alliance. Fadnavis, Shinde, and Chavan will meet to discuss and settle the issues, ensuring smooth governance in Maharashtra.
टॅग्स :Ravindra Chavanरविंद्र चव्हाणEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस