केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करतंय; विखे-पाटील आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 01:18 PM2021-04-09T13:18:38+5:302021-04-09T13:22:58+5:30

भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.

bjp radha krishna vikhe patil slams thackeray govt over corona situation in the state | केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करतंय; विखे-पाटील आक्रमक 

केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करतंय; विखे-पाटील आक्रमक 

googlenewsNext
ठळक मुद्देराधाकृष्ण विखे-पाटील यांची ठाकरे सरकारवर टीकापालकमंत्री पाहुण्यासारखे येतात - विखे-पाटीलनियोजन करण्यात राज्य सरकार अपयशी - विखे-पाटील

मुंबई: राज्यात गंभीर होत चाललेली कोरोनाची परिस्थिती आणि लसीचा तुटवडा यांवरून राजकारण तापत चालल्याची चिन्हे आहेत. कोरोना लसीच्या कमतरतेवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि विरोक्ष पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. मंत्र्यांना सध्या मुख्यमंत्र्यांनी एकच काम दिलंय. केंद्रावर आरोप करा आणि आपलं पाप झाका, अशी टीका विखे-पाटील यांनी केली आहे. (radha krishna vikhe patil slams thackeray govt over corona situation in the state)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करताना दिसत आहे. राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा चिमटा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काढला आहे. 

Anil Deshmukh: CBI च्या तपासाला वेग; अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील NIA च्या कार्यालयात दाखल

नियोजन करण्यात राज्य सरकार अपयशी

केंद्रावर बोट दाखवण्यापेक्षा रेमडेसिवीर, ऑक्सिजन उपलब्ध करा. प्रत्येक मंत्र्याला आपापल्या मतदारसंघात २०० बेडचं कोविड रुग्णालय उभारायला सांगा. इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्याला व्हॅक्सिन मिळाले. पण त्याचे नियोजन राज्य सरकार करू शकले नाही. तो नियोजनशून्य कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. हजारो रुग्ण रुग्णालयात आहेत. हजारो रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशा शब्दांत विखे-पाटील यांनी टीका केली. 

इथले पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात

नगर जिल्ह्यात ४ मंत्री आहेत. इथले पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात. त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात ते एकही कोविड रुग्णालय सुरू करू शकलेले नाहीत, असा खोचक टोला हसन मुश्रीफ यांना लगावत सगळी मदार खासगी रुग्णालयांच्या भरवश्यावर सोडली आहे. जिल्ह्यातील सर्व मंत्री करतात काय, असा संतप्त सवाल विखे-पाटील यांनी केला आहे.

“सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या असून, राज्याला पुरेसे लसीचे डोस मिळावेत, अशी मागणी राज्य सरकारकडून वारंवार केली जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून पुरेसे लसीचे डोस दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.
 

Web Title: bjp radha krishna vikhe patil slams thackeray govt over corona situation in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.