शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भाजपा खासदाराची पंकजा मुंडेंवर आगपाखड; पराभवाचं खापर दुसऱ्यांच्या माथी का मारताय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 12:42 IST

त्याचसोबत पंकजा मुंडे यांच्याकडे गांभीर्याने घेण्याचा विषय नाही. पक्षाने निर्णय घ्यावा असं सांगता, माझ्या बापाचा पक्ष आहे असं बोलता मग बापाने कारवाई करावी असं वाटतं का?

पुणे -  पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे आणि पक्ष सोडून कार्यक्रम ठेवावा एकही नेता येणार नाही. पंकजा मुंडे यांनी मुंडे कुटुंबांचे अस्तित्व जपावं, पराभवाचं खापर दुसऱ्यांच्या माथी का मारताय? मतदारसंघातील लोकांनी तुम्हाला मतदान केले नाही, चंद्रकांत पाटील कोल्हापूरातून पुण्यात येऊन निवडून आले. तुम्हाला मतदारसंघ सांभाळता आला नाही, बाहेरचे लोकांनी येऊन मतदान केलं आहे का? असा सवाल भाजपा खासदार संजय काकडे यांनी केला आहे. 

एबीपी माझाशी बोलताना संजय काकडे म्हणाले की, पंकजा मुंडे यांना एवढी पदं देऊन ३० हजारांच्यावर मतांनी पराभूत झाल्या. त्यांच्या मेळाव्याला पक्षाला काही हानीकारक होईल असं वाटत नाही. वैयक्तिक समाधान देणाऱ्या या गोष्टी आहे. ज्यांना स्वत:चं घर, मुठभर मतदारसंघ सांभाळता येत नाही, घरात एक खासदार, मंत्री असताना पराभूत होतात. गोपीनाथ मुंडे यांचे वलय असताना पराभवाला सामोरं जावं लागतं. पराभव पचविता येत नाही. पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच भाजपापासून ओबीसी समाज दुरावेल असं वाटत नाही, ५० पेक्षा अधिक भाजपा आमदार ओबीसी समाजाचे आहे. पंकजा मुंडे यांचे काल जातीपातीचं राजकारण केलं. ५ वर्ष सत्तेत असून मराठवाड्याच्या दुष्काळासाठी काय केलं? गोपीनाथ मुंडे यांनी तयार केलेले नेते ५ वर्षात पंकजा मुंडे यांच्या कोणत्या व्यासपीठावर दिसले. गेल्या ५ वर्षात कोणत्या समाजातील कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी सांभाळले आहे? असा घणाघातही संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला.  

त्याचसोबत पंकजा मुंडे यांच्याकडे गांभीर्याने घेण्याचा विषय नाही. पक्षाने निर्णय घ्यावा असं सांगता, माझ्या बापाचा पक्ष आहे असं बोलता मग बापाने कारवाई करावी असं वाटतं का? गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी खूप केलं त्यांना पक्षानेही तेवढाच सन्मान दिला. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वेगळा ड्रामा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मुठभर लोकांना घेऊन अशाप्रकारे व्यासपीठावर भाषणं केली अशी टीकाही काकडेंनी केली. 

दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केलेल्यांची गय केली जाणार नाही, मी जर काल गोपीनाथ मुंडे गडावर गेलो नसतो तर तीव्रता वाढली असती. संवादाने खूप गोष्टी सुटतात. मतभेद असतात, बंड केलेल्यांची उदाहरण सांगितलं बंड स्वकीयांविरोधात करायचं नसतं. आपल्या माणसांविरोधात भांडायचं नसतं चर्चा करायची असते. केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया चालणार नाही. काम चांगलं केलं तर बक्षिसही मिळेल पण पक्षाच्या विरोधात केलं तर शिक्षा दिली जाईल असा सूचक इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपातील नाराज नेत्यांना दिला आहे.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाSanjay Kakdeसंजय काकडेchandrakant patilचंद्रकांत पाटीलGopinath Mundeगोपीनाथ मुंडे