शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

भाजप नेत्यांकडून अवास्तव आश्वासनांवर अंकुश ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 3:43 PM

भाजपकडून अवास्तव आश्वासने देण्यावर अंकुश ठेवण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भातही सरकारने हीच भूमिका घेतली आहे. मात्र विरोधकांच्या आश्वासनांमुळे मतदारांवर परिणाम झाल्यास, हे भाजपला परवडणारे ठरणार हे नक्की.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षातील नेत्यांकडून मनमोकळ्यापणाने आश्वासने देण्यात येत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कर्जमाफी देऊ अशी आश्वासने विरोधक देत आहेत. त्याचवेळी भाजपकडून आश्वासनांवर अकुंश ठेवण्यात येत असल्याचे दिसून येते.

2014 मध्ये भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील अनेक आश्वासने देण्यात आली होती. लोकसभेला भाजपकडून वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण करण्यात भाजपला अपयश आले. तर राज्याच्या निवडणुकीत भाजप नेत्यांनी मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणासह स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचं आश्वासन दिले होते.

या आश्वासनांपैकी मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ होते. राज्य सरकारने न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडून मराठा आरक्षणासाठी सकारात्मक भूमिका घेतली. मात्र सरकारला धनगर आरक्षण आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात अपयश आले. तर कर्जमाफीचा लाभही बोटांवर मोजण्याइतपतच शेतकऱ्यांना मिळाला. यावरून भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

निवडून येण्याचा विश्वासविधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता स्थापन करू, असा विश्वास भाजपला आहे. त्यामुळे भाजपकडून अवास्तव आश्वासने देण्यावर अंकुश ठेवण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भातही सरकारने हीच भूमिका घेतली आहे. मात्र विरोधकांच्या आश्वासनांमुळे मतदारांवर परिणाम झाल्यास, हे भाजपला परवडणारे ठरणार हे नक्की.