शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बाळासाहेबांनी 'तसा' शब्द घेतला असेल, असं वाटत नाही; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 10:00 PM

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाचा आग्रह लावून धरला. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असा शब्द बाळासाहेबांना दिल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यावेळी वारंवार म्हटलं होतं. त्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत स्थापन केलेलं सरकार म्हणजे जनादेशाची प्रतारणा असल्याची टीका त्यांनी केली. मला उद्धव ठाकरेंचं अतिशय आश्चर्य वाटतं. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असं वचन बाळासाहेबांना दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात. पण काँग्रेसच्या पाठिंब्यानं शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असं वचन बाळासाहेबांनी उद्धव यांच्याकडून घेतलं असेल, असं मला वाटत नाही, असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला. बाळासाहेबांनी काँग्रेसवर कायम टीका केली होती. त्यांनी काँग्रेसला टोकाचा विरोध केला होता. मात्र आता उद्धव ठाकरे त्याच काँग्रेससोबत गेले आहेत, असंदेखील फडणवीस लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. शिवसेना आमच्यासोबत असताना त्यांचा मान राखला जायचा. मात्र आता परिस्थिती वेगळी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. 'शिवसेना आमच्यासोबत असताना मातोश्रीवरुन आदेश द्यायचे आणि आम्ही ते आदेश पाळायचो. मात्र आता त्यांना सिल्व्हर ओक, ट्रायडंटवर जावं लागतं,' असा चिमटा फडणवीसांनी काढला. आता सामनाचे अग्रलेख बघा. त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यांना काँग्रेसला खूश ठेवायचं आहे. याशिवाय जुन्या मतदारांनादेखील सांभाळायचं आहे. नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर त्यांनी 'नरो वा कुंजरो वा' अशी भूमिका घेतली आहे. तीन पक्षांचं सरकार फार काळ चालत नाही, हा इतिहास आहे, असं फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस