शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

'अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत; उद्धव ठाकरेही कंटाळतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 09:10 IST

चोरुन सत्तेवर आलेल्या महाविका आघाडीच्या सरकारने दिलेला शब्द पाळला नाही.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील निकष आणि अटींविरोधात भाजपाकडून कोल्हापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. चुकीचे निकष आणि जाचक अटी रद्द करुन सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय भाजपा शांत बसणार नसल्याचे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, चोरुन सत्तेवर आलेल्या महाविका आघाडीच्या सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. तसेच सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. त्यामुळे कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काडीचाही फायदा होणार नाही. त्यामुळे चुकीचे निकष आणि जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्याचप्रमाणे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकीत शांत दिसतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच सगळ्या घोषणा करत आहेत. त्यामुळे नक्की मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे की अजित पवार असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच अजित पवारांना एक दिवस उद्धव ठाकरेच कंटाळतील असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. 

शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर आणण्याणासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे. सरकारला जाग येत नसल्यानेच शाहू महाराजांच्या कोल्हापूरातून आम्ही हा आवाज उठवला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच या योजनेमध्ये पीककर्जाचा उल्लेख केल्याने नियमित कर्ज भरणाऱ्या, बँका आणि पतसंस्थांचे कर्ज काढलेल्या, मायक्रो फायनान्सचे,भूविकासचे कर्ज काढलेल्या अशा कोणत्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत नाही. 2019/ 20 या वर्षातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश नाही. म्हणूनच आम्ही सरसकट कर्जमाफीचा आग्रह धरत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी