शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्ताव अजून ठाकरे सरकारच्याच विचाराधीन!; भाजपचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 17:45 IST

एका माहितीच्या अधिकारातील उत्तराचा हवाला देत भाजपने यासंदर्भात मोठा दावा केला आहे. ‘

ठळक मुद्देत्या १२ आमदारांचा प्रस्ताव विचाराधीनसोमेश कोळगे यांनी RTI अंतर्गत विचारली होती माहितीमुख्यमंत्री मंत्रालयातच जात नसल्याने विचार पूर्ण झाला नाही का? - केशव उपाध्ये

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे अनेक मुद्द्यांवरून राज्यात राजकीय वातावरण तापलेले दिसत आहेत. सत्ताधारी ठाकरे सरकार आणि भाजप यांच्या विविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच विधान परिषदेतील आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. मात्र, यातच आता ‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्ताव अजून ठाकरे सरकारच्याच विचाराधीन असल्याचा मोठा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. (bjp keshav upadhye thackeray govt 12 mcls governor quota member appointment rti)

आताच्या घडीला कोरोनाची परिस्थिती, लसीकरण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवरून राजकीय वर्तुळात खडाजंगी होताना पाहायला मिळत आहे. विधान परिषदेसाठी राज्यपालांकडे १२ जणांची नावं पाठवलेली आहेत, मात्र राज्यपाल दिरंगाई करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, एका माहितीच्या अधिकारातील उत्तराचा हवाला देत भाजपने यासंदर्भात मोठा दावा केला आहे. ‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्ताव अजून ठाकरे सरकारच्याच विचाराधीन असल्याचे भाजपने म्हटले आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट केले आहे. 

त्या १२ आमदारांचा प्रस्ताव विचाराधीन 

त्या १२ आमदारांचा प्रस्ताव विचाराधीन मुख्यमंत्री कार्यालयाचे माहिती कायदा अतंर्गत उत्तर. प्रश्न होता-प्रस्ताव कधी पाठवला? कोणती नावे पाठविली? काही उत्तर आले का? हा प्रस्तावच विचाराधीन असल्याचे सांगितले आहे, मात्र आता संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे?, असे प्रश्न केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारले आहेत. 

देशातील प्रत्येक नागरिकाला लसीचा किमान पहिला डोस कधीपर्यंत मिळेल?; केंद्रानं केलं स्पष्ट

आता खुलासा व्हायला हवा

कारण हा प्रस्तावच अजून विचाराधीन आहे. सोमेश कोळगे यांनी ही माहिती RTI अंतर्गत विचारली होती. आता खुलासा व्हायला हवा… पूर्वी ठरलेली नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे का? तिन्ही पक्षांचा कोटा बदलतोय का? मुख्यमंत्री मंत्रालयातच जात नसल्याने विचार पूर्ण झाला नाही का?, अशी विचारणाही केशव उपाध्ये यांनी केली आहे. तसेच या ट्विटसोबत माहिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराची प्रत केशव उपाध्ये यांनी जोडली आहे. 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राज्यपाल कोट्यातून नियुक्त करण्याच्या १२ आमदारांच्या प्रस्तावावरून राज्य सरकारमधील मंत्री आणि तिन्ही पक्षांचे नेते राज्यपालांवर निशाणा साधताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राजभवनातून १२ जणांची नावे असलेली फाईलच बेपत्ता झाल्याचीही माहिती समोर आली होती.  

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना