शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

"राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय, डोळ्यांसमोर महिलांना उद्ध्वस्त होताना पाहायचं?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 09:11 IST

क्वारंटाईन सेंटरमध्ये 20 वर्षीय विवाहितेवर सुरक्षारक्षकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यावरून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई - मीरा भाईंदर येथील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये 20 वर्षीय विवाहितेवर सुरक्षारक्षकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यावरून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय आणि डोळ्यांसमोर महिला, मुलींना उद्ध्वस्त होताना पाहायचं? राज्यात ३ पक्षांचे ३ मुख्यमंत्री आणि एक सुपर मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये याची दखल तरी कोण घेणार ही परिस्थिती आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "हे लिहीत असताना आग मस्तकात जातीये, पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये २० वर्षीय मुलीवर मीराभाईंदरला तिथल्या सुरक्षारक्षकांकडून बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली. राज्यात ३ पक्षांचे ३ मुख्यमंत्री आणि एक सुपर मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये याची दखल तरी कोण घेणार ही परिस्थिती आहे" असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. 

"माँ जिजाऊ, सावूमाई, रमाई, भिमाई फक्त भाषणांपुरतचं"

"राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय आणि डोळ्यांसमोर महिला, मुलींना उद्ध्वस्त होताना पाहायचं. SOP ची मागणी गेली ४ महिने सातत्याने सरकारकडे करतोय. इतर घटनेत तत्परता दाखवणारं सरकार महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर उदासीन का? माँ जिजाऊ, सावूमाई, रमाई, भिमाई फक्त भाषणांपुरतचं" असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील पाथरली नजीकच्या कोविड सेंटरला आणि कल्याणमधील केंद्रांना त्यांनी भेट दिली. त्यावेळी महिला रुग्णांच्या सुविधा नसल्याने महिला असुरक्षित असून राज्य शासनाने त्यासंदर्भात वेळीच लक्ष घालावे असं म्हटलं होतं. 

"राज्य शासन नेमकं महिलांसाठी करतंय तरी काय?"

कल्याण डोंबिवलीप्रमाणेच राज्यातील कोरोना सेंटरमध्ये महिला रुग्ण सुरक्षित नाहीत. यासंदर्भात अनेक तक्रारी करूनही कोणतीही सुधारणा होत नसल्याने राज्य शासनाच्या मुख्य अजेंड्यावर महिला सुरक्षा हा मुद्दा आहे की नाही हा मुख्य सवाल आहे.  कल्याण-डोंबिवलीतील कोरोना सेंटरमध्ये देखील सीसी कॅमेरे नाहीत, महिला सुरक्षा रक्षक नाहीत ही शोकांतिका असून ते योग्य नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. वसई विरारमध्ये देखील अशीच अवस्था असून त्यात तातडीने सुधारणा होणे गरजेचे आहे. केवळ कोविड सेंटर पुरता महिला सुरक्षा हा प्रश्न मर्यादित नसून चार महिन्याचा आढावा घेतला असता ठिकठिकाणी महिलांवर अत्याचार झाले आहेत, ते अल्पवयीन मुलींपर्यंत पोहोचले असून राज्य शासन नेमकं महिलांसाठी करतंय तरी काय? छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा हा महाराष्ट्र आहे का? गृहमंत्री, मुख्यमंत्री यासारख्या गंभीर विषयावर गप्प का आहेत? असा सवालही वाघ यांनी केला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : अरे व्वा! 105 वर्षीय आजींनी जिंकली कोरोनाची लढाई, व्हायरसवर केली यशस्वी मात

"देशात भीतीचं वातावरण, संसदेत 'या' मुद्द्यांवर चर्चा होणं आवश्यक"

"ही तर राज्यपुरस्कृत दहशत, आरोपींची 10 मिनिटांत सुटका", फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

CoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत

...म्हणून कंगना राणौतला दिली ‘Y’ दर्जाची सुरक्षा, मोदी सरकारने सांगितलं खरं कारण

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघBJPभाजपाRapeबलात्कारMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याMira Bhayanderमीरा-भाईंदरWomenमहिला