शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

औरंगाबादेत विराट मोर्चा

By admin | Updated: February 14, 2015 03:48 IST

केबीसीच्या जप्त मालमत्तेचा लिलाव करा,’ ‘आमच्या घामाचा पैसा हक्काने घेऊ’, ‘आमचे पैसे हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’

औरंगाबाद : ‘केबीसीच्या जप्त मालमत्तेचा लिलाव करा,’ ‘आमच्या घामाचा पैसा हक्काने घेऊ’, ‘आमचे पैसे हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा घोषणा देत राज्यभरातील ठेवीदारांनी शुक्रवारी औरंगाबादेत विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. मोर्चापूर्वी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने मेळावा घेण्यात आला. मोर्चा आणि मेळाव्यासाठी किनवटसारख्या दुर्गम भागातून ठेवीदार आले होते. हातात काठी धरून चालणाऱ्या वृद्ध महिलाही आल्या होत्या. गर्दीमुळे सभागृह अपुरे पडले होते़ समितीचे अध्यक्ष करण गायकर म्हणाले की, केबीसीची संपत्ती शासनाने जप्त केली आहे़ तिचा लिलाव करून ठेवीदारांना त्यांचे पैसे वाटून देण्यात यावे. जोपर्यंत केबीसीचे मुख्य भाऊसाहेब चव्हाण व आरती चव्हाण यांना अटक होत नाही, तोपर्यंत अन्य संचालकांना जामीन देऊ नका, अशी मागणी त्यांनी केली. मेळाव्यानंतर मोर्चा काढून विभागीय उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.