शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

जलयुक्त शिवारच्या शासकीय कामांचे अॉडिट करा -  राधाकृष्ण विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 7:36 PM

जलयुक्त शिवारच्या शासकीय कामांचे जिल्हानिहाय ऑडिट करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

मुंबई: जलयुक्त शिवार योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले दावे वस्तुनिष्ठ नाहीत. आमिर खान, नाना पाटेकर आदींच्या संस्थांनी केलेल्या श्रमदानातून झालेली कामे वगळता शासन स्तरावर झालेल्या कामांमध्ये प्रचंड घोळ आहे. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या शासकीय कामांचे जिल्हानिहाय ऑडिट करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

भाजप-शिवसेना राज्य सरकारला ४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पत्रकारांना प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी ही मागणी केली. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, जलयुक्त शिवार ही सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे मुख्यमंत्री सांगतात. पर्जन्यमान कमी असतानाही जलयुक्त शिवारामुळे मातीत मुरलेल्या पाण्यावर शेती झाल्याचा दावा मुख्यमंत्री करतात. मात्र, जलयुक्त शिवारचे पाणी नेमके कुठे आणि किती मुरले, त्याचा पर्दाफाश आपण येत्या हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेत्यांनी दिला.

दुष्काळी नियोजनात सरकार कमी पडत असल्याच्या मुद्यावरूनही त्यांनी बोचरी टीका केली. हे सरकार दुष्काळाचा आढावा हे उपग्रहावरून घेते. उद्या मुख्यमंत्री वर्षा बंगल्याऐवजी मंगळावरून राज्यकारभार करतील आणि तिथेही पाणी सापडले म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेतील. सरकारची कर्जमाफी फसली. खरीप २०१८ मध्ये पीक कर्जाचे वितरणही फसले. शेतमालाची विक्रमी धान्य खरेदी केली म्हणून सरकार ढोल बडवते आहे. मात्र बाजारात भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्रावर यावे लागले, याची जाणीव या सरकारला नाही. सरकारने किती खरेदी केली, यासोबतच शासकीय खरेदी न झालेल्या व बाजारात हमीभावापेक्षा किती तरी कमी किंमतीने विकल्या गेलेल्या धान्याचीही माहिती सरकारने द्यावी, असे राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले.

शिक्षणात महाराष्ट्र १३ व्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आल्याचा गाजावाजा मुख्यमंत्री करतात. पण शिक्षण विभागात सुरू असलेला सावळागोंधळ बघितला तर मुख्यमंत्र्यांनी वरून खालचा क्रमांक मोजला की, खालून वरचा क्रमांक मोजला,  असा खोचक सवालही त्यांनी केला. सामाजिक न्याय, आदिवासी विकास हे विभाग कधीही या सरकारच्या प्राधान्यक्रमावर नव्हते. मागील ४ वर्षात हे विभाग मंत्र्यांच्या अजब कार्यकर्तुत्वामुळे चर्चेला आले आहेत. अल्पसंख्यांक विभागाचे काम तर अदृष्यच आङे. राज्याला पूर्णवेळ कृषी मंत्री नाही. अनेक विभागांमधील महत्वाची पदे रिक्त आहेत. मेगा भरतीची घोषणा तूर्तास तरी पोकळच ठरली आहे.

या सरकारला मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या मागणीबाबत आश्वस्त करता आलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांबाबत अक्षम्य हेळसांड सुरू आहे. मनरेगासारख्या महत्वाकांक्षी योजनेचा बोजवारा उडाला आहे. १०० मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचा आलेख दरदिवशी घसरतो आहे. मंत्रिमंडळातील दीड डझन मंत्र्यांचा भ्रष्टाचार आणि त्यांना क्लिन चिट देण्याचा मुख्यमंत्र्यांचा सपाटा, एवढीच या सरकारची मागील ४ वर्षातील कामगिरी राहिली आहे. मोदींचे फसलेले क्लिन इंडिया मिशन आणि फडणवीसांचे क्लिन चिट मिशन, हीच या सरकारची ओळख असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

स्मार्ट सिटी, मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, हे सारे केवळ स्टंट ठरले आहेत.  मेक इन महाराष्ट्र मध्ये ८ लाख कोटी गुंतवणूक येणार होती. प्रत्यक्षात ७४ हजार कोटी म्हणजे १० टक्के इतकीही गुंतवणूक झालेली नाही. सरकारच्या नियोजनशून्यतेमुळे मेट्रो प्रकल्पाचा खर्च दिवसागणिक ३० कोटींनी वाढतो आहे. नागपूर-मुंबई महामार्ग असताना तो विकसित न करता, केवळ काही मूठभर उद्योजक,बिल्डर्स व अधिकाऱ्यांच्या समृध्दीसाठी मुख्यमंत्र्यांनी समृध्दीचा महामार्गाचा हट्ट धरला. आधीच राज्यावर ५ लाख कोटींचे कर्ज आहे, महसूली तूट आहे. महसूली उत्पन्नात वाढीसाठी प्रयत्न नाहीत. त्यामुळे विकासकामे व सामाजिक क्षेत्रांवरील खर्च घटत चाललेला आहे. अशा परिस्थितीत समृध्दीसारखे घाट घालायचे, ही एकप्रकारे आर्थिक बेशिस्तच आहे. साडेसहा लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती, बी.डी.डी. चाळीचा पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास या साऱ्या योजना आज रखडलेल्या आहेत आणि या भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे, असा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी केला.

राज्यात समस्या निर्माण झाली की दरवेळी मुख्यमंत्री आपण अभ्यास करीत असल्याचे सांगतात. मात्र प्रत्येक आघाडीवर सरकार साफ अपयशी ठरले असून, हा सगळा मुख्यमंत्र्यांच्या अभ्यासाचा परिणाम आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता अभ्यास थांबवावा आणि राज्याची अधोगती टाळण्यासाठी यापूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराची कॉपी करावी, अशी खोचक टोलेबाजीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMaharashtraमहाराष्ट्र