शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

"हुकुमशाही कोणाची होती, हे भाजपाच्या नेत्यांना खासगीत विचारा, ते सांगतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 18:07 IST

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सुरुवातीपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला.

ठळक मुद्देराज्यातील सर्वसामान्यांची काळजी वाहणारे भाजपाचे नेते पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांबद्दल का बोलत नाहीत, असा सवालही यावेळी रोहित पवार यांनी केला.

अहमदनगर : महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला जात असून कोणतेही मतभेद नाही, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. तसेच, भाजपा सरकारच्या काळात एका व्यक्तीची मक्तेदारी आणि हुकुमशाही होती. भाजपाच्या नेत्यांना जरा खासगीत विचारा, ते सुद्धा तुम्हाला असेच सांगतील, असा रोहित पवार यांनी भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सुरुवातीपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, "भाजपाकडे सरकारवर टीका करण्यास मुद्दे नाहीत. त्यामुळे समन्वयाबद्दल बोलले जात आहे. मात्र, याला काही अर्थ नाही. भाजपाचे राज्यातील नेते राजकीय पतंग उडवून जनतेची दिशाभूल करत आहेत." याशिवाय,  आघाडी सरकारमध्ये कुठलाही मतभेद नाही. वरिष्ठ पातळीवर चर्चा करून सर्व निर्णय घेतले जातात, असे रोहित पवार यांनी सांगितले.

याचबरोबर, येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधील 'रोखठोक' या सदरातून संजय राऊत यांनी यासंदर्भात म्हटले आहे. याबाबतही रोहित पवार यांनी भाष्य केले. 'भाजपाचा एकूण अनुभव आणि विचारसरणी पाहता ते फार दिवस सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत. कर्नाटक, मध्य प्रदेशातही काहीतरी वेडेवाकडे करून भाजपाने सत्तेत येण्याचा प्रयत्न केला, असे रोहित पवार म्हणाले. तसेच, याठिकाणी होईल, असे संजय राऊत यांना वाटत असावे. भाजपाबद्दलच्या त्यांच्या अनुभवावरून ते तसे बोलले असावेत. मात्र, भाजपाच्या त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होईल, असे ते म्हणाले नाहीत, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

याशिवाय, कोरोनाच्या मुदद्यावर विरोधकांकडून होणारे आरोप बिनबुडाचे आहेत. देशात सर्वाधिक कोरोना टेस्ट महाराष्ट्रात होत आहेत. त्या प्रमाणात रुग्णही वाढत आहेत. राज्य सरकार कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. राज्यातील सर्वसामान्यांची काळजी वाहणारे भाजपाचे नेते पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांबद्दल का बोलत नाहीत, असा सवालही यावेळी रोहित पवार यांनी केला.

आणखी बातम्या...

अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी

Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता

21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार? केवळ दहा हजार भाविकांना परवानगी

चीनला पुन्हा झटका, भारतानंतर आता 'हा' देश टिकटॉवर बंदी घालण्याच्या तयारीत

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस