शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
3
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
5
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
6
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
7
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
8
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
9
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
10
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
11
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
12
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
13
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
14
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
15
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
16
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
17
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
18
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
19
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
20
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
Daily Top 2Weekly Top 5

"हुकुमशाही कोणाची होती, हे भाजपाच्या नेत्यांना खासगीत विचारा, ते सांगतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 18:07 IST

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सुरुवातीपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला.

ठळक मुद्देराज्यातील सर्वसामान्यांची काळजी वाहणारे भाजपाचे नेते पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांबद्दल का बोलत नाहीत, असा सवालही यावेळी रोहित पवार यांनी केला.

अहमदनगर : महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला जात असून कोणतेही मतभेद नाही, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. तसेच, भाजपा सरकारच्या काळात एका व्यक्तीची मक्तेदारी आणि हुकुमशाही होती. भाजपाच्या नेत्यांना जरा खासगीत विचारा, ते सुद्धा तुम्हाला असेच सांगतील, असा रोहित पवार यांनी भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सुरुवातीपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, "भाजपाकडे सरकारवर टीका करण्यास मुद्दे नाहीत. त्यामुळे समन्वयाबद्दल बोलले जात आहे. मात्र, याला काही अर्थ नाही. भाजपाचे राज्यातील नेते राजकीय पतंग उडवून जनतेची दिशाभूल करत आहेत." याशिवाय,  आघाडी सरकारमध्ये कुठलाही मतभेद नाही. वरिष्ठ पातळीवर चर्चा करून सर्व निर्णय घेतले जातात, असे रोहित पवार यांनी सांगितले.

याचबरोबर, येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधील 'रोखठोक' या सदरातून संजय राऊत यांनी यासंदर्भात म्हटले आहे. याबाबतही रोहित पवार यांनी भाष्य केले. 'भाजपाचा एकूण अनुभव आणि विचारसरणी पाहता ते फार दिवस सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत. कर्नाटक, मध्य प्रदेशातही काहीतरी वेडेवाकडे करून भाजपाने सत्तेत येण्याचा प्रयत्न केला, असे रोहित पवार म्हणाले. तसेच, याठिकाणी होईल, असे संजय राऊत यांना वाटत असावे. भाजपाबद्दलच्या त्यांच्या अनुभवावरून ते तसे बोलले असावेत. मात्र, भाजपाच्या त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होईल, असे ते म्हणाले नाहीत, असे रोहित पवार यांनी सांगितले. 

याशिवाय, कोरोनाच्या मुदद्यावर विरोधकांकडून होणारे आरोप बिनबुडाचे आहेत. देशात सर्वाधिक कोरोना टेस्ट महाराष्ट्रात होत आहेत. त्या प्रमाणात रुग्णही वाढत आहेत. राज्य सरकार कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. राज्यातील सर्वसामान्यांची काळजी वाहणारे भाजपाचे नेते पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांबद्दल का बोलत नाहीत, असा सवालही यावेळी रोहित पवार यांनी केला.

आणखी बातम्या...

अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी

Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता

21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार? केवळ दहा हजार भाविकांना परवानगी

चीनला पुन्हा झटका, भारतानंतर आता 'हा' देश टिकटॉवर बंदी घालण्याच्या तयारीत

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस