शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीचा तिढा कायम

By admin | Updated: September 24, 2014 05:11 IST

एकीकडे महायुतीचे एकदाचे जमले असे चित्र असताना आघाडीतील बिघाडी मात्र मंगळवारीही कायम राहिली. आघाडीची पुन्हा सत्ता आल्यास अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि १४४ जागांची मागणी राष्ट्रवादीने केली

मुंबई : एकीकडे महायुतीचे एकदाचे जमले असे चित्र असताना आघाडीतील बिघाडी मात्र मंगळवारीही कायम राहिली. आघाडीची पुन्हा सत्ता आल्यास अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि १४४ जागांची मागणी राष्ट्रवादीने केली असून, राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव फेटाळत १२४ जागा देण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली आहे. त्यामुळे सकाळी झालेली जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरली असून, यावर आता बुधवारपर्यंत अंतिम तोडगा काढला जाईल, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा निवासस्थानी दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, बांधकाम मंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते. आघाडीमध्ये ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे सूत्र ठरले असताना राष्ट्रवादीने मंगळवारी अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव काँग्रेसपुढे ठेवला. आपण अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मागत आहात म्हणजे काँग्रेसपेक्षा जास्त जागा निवडून येणार नाहीत, अशी आपल्याला शंका वाटते का, असा सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीत केल्यानंतर राष्ट्रवादीने हा मुद्दा लावून धरला नाही, असे समजते. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून तिढा सुटणार नसेल तर दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींशी याबाबत चर्चा करावी, असा सूर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत लावला पण जागावाटपाची कोणतीही चर्चा आता दिल्लीत होणार नाही. श्रेष्ठींनी आम्हाला त्याबाबतचे सर्वाधिकार दिलेले आहेत, असे मुख्यमंत्री चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी मंगळवारच्या बैठकीत स्पष्ट केले.राष्ट्रवादी काँग्रेस १४४ जागांवर ठाम असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रवादीने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मागितले असल्याची माहिती उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांना दिली. (विशेष प्रतिनिधी)