शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 12:44 IST

शिवसेनेसोबत आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या बैठका सुरू होत्या. यावेळी त्या पक्षांच्या अंतर्गत बैठकाही होत होत्या.

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कर्नाटकच्या राजकीय नाट्याचा पुढचा अंक सुरू झाला आहे. शरद पवार यांच्या कुटुंबातील वाद याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. पुतण्या अजित पवार यांनी बंडाचा झेंडा उगारत थेट भाजपाला मदत केली आहे. सध्यातरी शरद पवार यांचे पारडे जड असले तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार एकटे पडताना दिसत आहेत. यामागे भाजपाच्या धुरिणांचा हात आहे. शनिवारी ही राजकीय उलथापालथ झालेली असली तरीही तब्बल 10 दिवसांपासून अजित पवार भाजपाच्या संपर्कात असताना राजकारणातील भीष्मपितामह म्हटले जाणाऱ्या शरद पवारांना साधी भनकदेखील लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

अजित पवार हे भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही काळापासून संपर्कात असल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. शिवसेनेसोबत आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या बैठका सुरू होत्या. यावेळी त्या पक्षांच्या अंतर्गत बैठकाही होत होत्या. यावेळी 17 नोव्हेंबरला पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांनी त्यांच्या काल उचललेल्या पावलाबाबत संकेत दिले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर शिवसेनेसोबत आघाडीचे सरकार बनविण्यापेक्षा भाजपाला सरकारस्थापनेसाठी मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांचा प्रस्ताव शरद पवारांनी फेटाळून लावला होता. कारण तेव्हा शिवसेना, काँग्रेससोबत सरकारस्थापनेची चर्चा अखेरच्या टप्प्यावर होती. तसेच दिल्ली, मुंबईत अनेकदा चर्चाही होत होती.

शरद पवार हे अजित पवारांच्या मनात काय चाललेय हे ओळखण्यात अपयशी ठरले. यानंतर एका आठवड्याच्या आतच अजित पवार यांनी भाजपसोबत संधान साधले आहे. एवढेच नाही तर विधानपरिषदेचे नेते धनंजय मुंडे आणि माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनीही शरद पवारांच्या मुंबईतील घरी हा प्रस्ताव ठेवला होता, असे या वृत्तामध्ये म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये पहिल्यांदा 10 नोव्हेंबरला गुफ्तगू झाली होती. यानंतर रोजच दोन्ही नेते संपर्कात होते. याचवेळी अजित पवार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बैठकींना हजर राहत होते. एकाच दिवसात अनेकदा फडणवीस फोनवर बोलत होते. अजित पवारांच्या मनात काय आहे याची पुरेपूर कल्पना केवळ धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरे यांना होती. तटकरेंवर अजितदादांचा विश्वास तर मुंडेंवर फडणवीसांचा विश्वास होता. 

यानंतर अजित पवारांनी गेल्या सोमवारपासूनच राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करण्यास सुरुवात केली होती. मी मोठे पाऊल उचलले तर तुम्ही माझ्या सोबत असाल का? असा प्रश्न त्यांनी आमदारांना विचारला होता. मात्र, त्यांनी हे मोठे पाऊल काय हे सांगितले नव्हते. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाDhananjay Mundeधनंजय मुंडेsunil tatkareसुनील तटकरे