शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 12:44 IST

शिवसेनेसोबत आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या बैठका सुरू होत्या. यावेळी त्या पक्षांच्या अंतर्गत बैठकाही होत होत्या.

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कर्नाटकच्या राजकीय नाट्याचा पुढचा अंक सुरू झाला आहे. शरद पवार यांच्या कुटुंबातील वाद याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. पुतण्या अजित पवार यांनी बंडाचा झेंडा उगारत थेट भाजपाला मदत केली आहे. सध्यातरी शरद पवार यांचे पारडे जड असले तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार एकटे पडताना दिसत आहेत. यामागे भाजपाच्या धुरिणांचा हात आहे. शनिवारी ही राजकीय उलथापालथ झालेली असली तरीही तब्बल 10 दिवसांपासून अजित पवार भाजपाच्या संपर्कात असताना राजकारणातील भीष्मपितामह म्हटले जाणाऱ्या शरद पवारांना साधी भनकदेखील लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

अजित पवार हे भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही काळापासून संपर्कात असल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. शिवसेनेसोबत आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या बैठका सुरू होत्या. यावेळी त्या पक्षांच्या अंतर्गत बैठकाही होत होत्या. यावेळी 17 नोव्हेंबरला पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांनी त्यांच्या काल उचललेल्या पावलाबाबत संकेत दिले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर शिवसेनेसोबत आघाडीचे सरकार बनविण्यापेक्षा भाजपाला सरकारस्थापनेसाठी मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांचा प्रस्ताव शरद पवारांनी फेटाळून लावला होता. कारण तेव्हा शिवसेना, काँग्रेससोबत सरकारस्थापनेची चर्चा अखेरच्या टप्प्यावर होती. तसेच दिल्ली, मुंबईत अनेकदा चर्चाही होत होती.

शरद पवार हे अजित पवारांच्या मनात काय चाललेय हे ओळखण्यात अपयशी ठरले. यानंतर एका आठवड्याच्या आतच अजित पवार यांनी भाजपसोबत संधान साधले आहे. एवढेच नाही तर विधानपरिषदेचे नेते धनंजय मुंडे आणि माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनीही शरद पवारांच्या मुंबईतील घरी हा प्रस्ताव ठेवला होता, असे या वृत्तामध्ये म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये पहिल्यांदा 10 नोव्हेंबरला गुफ्तगू झाली होती. यानंतर रोजच दोन्ही नेते संपर्कात होते. याचवेळी अजित पवार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बैठकींना हजर राहत होते. एकाच दिवसात अनेकदा फडणवीस फोनवर बोलत होते. अजित पवारांच्या मनात काय आहे याची पुरेपूर कल्पना केवळ धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरे यांना होती. तटकरेंवर अजितदादांचा विश्वास तर मुंडेंवर फडणवीसांचा विश्वास होता. 

यानंतर अजित पवारांनी गेल्या सोमवारपासूनच राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करण्यास सुरुवात केली होती. मी मोठे पाऊल उचलले तर तुम्ही माझ्या सोबत असाल का? असा प्रश्न त्यांनी आमदारांना विचारला होता. मात्र, त्यांनी हे मोठे पाऊल काय हे सांगितले नव्हते. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाDhananjay Mundeधनंजय मुंडेsunil tatkareसुनील तटकरे