शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

“मनोज जरांगे महाराष्ट्रातील सर्वांत मोठा नेता, राजकारणात यायचा विचार करावा”: इम्तियाज जलील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 13:45 IST

Imtiyaz Jaleel And Manoj Jarange Patil: विधानसभा, लोकसभेत आपल्या विचारांचे लोक पाठविणार नाही, तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, असे जलील यांनी म्हटले आहे.

Imtiyaz Jaleel And Manoj Jarange Patil: महाराष्ट्रात आजच्या घडीला सर्वांत मोठा नेता कोणता असेल तर मनोज जरांगे पाटील आहे. मनोज जरांगे यांची समाजासाठीची तळमळ, प्रामाणिकता पाहून समाज त्यांच्याकडे आकृष्ट झालेला आहेत. स्टंट करणाऱ्या नेत्यांना जनता लगेच ओळखते. पण मनोज जरांगे कोणताही स्टंट न करता समाजाचे प्रश्न सोडवण्यास पुढाकार घेत आहे. मराठा समाजाने जरांगे पाटील यांना आपला नेता मानले आहे. मनोज जरांगे यांनी राजकारणात यायचा विचार करावा, असे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. 

आपल्या विचारांचे लोक विधानसभा, लोकसभेत पाठविणार नाही, तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, हे माझ्या मुस्लीम समाजाला नेहमीच सांगत असतो. गल्लीत कायदे बनत नाहीत, त्यासाठी सभागृहातच जावे लागते. मनोज जरांगे यांनाही हाच सल्ला देईन. त्यांनी याचा विचार करावा. लोक टीका करतील, पण त्याचा विचार त्यांनी करू नये. कारण आरक्षणावर मार्ग काढायचा असेल तर ते विधानसभा आणि संसदेतूनच होईल. जरांगे पाटील यांनी कितीही तीव्र आंदोलन केले तरी निर्णय सरकारच घेणार आहे, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदी यांचा काहीही भरवसा नाही

मराठा समाजाचे आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळाने मनोज जरांगेंची भेट घेतली, तेव्हा ते कशाप्रकारे आश्वासन देत होते. आपण सर्वांनी पाहिले. पंतप्रधान मोदी यांचा काहीही भरवसा नाही, राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही ते निवडणुका जाहीर करू शकतात. तेव्हा राज्य सरकार सांगेल की, आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे आरक्षण देता येणार नाही. अनेक समाजांना गेल्या कित्येक वर्षांपासून असेच मुर्खात काढण्यात आलेले आहे, या शब्दांत जलील यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, आमचा मार्ग राजकारण नाही. गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे. आरक्षण मिळाले पाहिजे. ही पोरे मोठी झाली पाहिजे, असे आम्हाला वाटते. नेमका आमचा राजकारणानेच घात केलाय. जनचळवळीत इतकी ताकद आहे की ते आता सिद्ध झाले आहे. लोकांचा समज होता की, आंदोलनाने काही होत नाही. हा खूप मोठा गैरसमज होता. गरिबांचे कामच नाही की सामाजिक क्षेत्रात जाऊन चळवळ करणे. परंतु, याच आंदोलनामुळे ५६ लाख लोकांना आरक्षण मिळाले आहे. याचा अर्थ आंदोलनात ताकद आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी जलील यांच्या आवाहनावर दिली.

 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील