शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

"ज्याला एक खाते चालवता येत नाही, त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 18:09 IST

गुजरातचं भलं करण्याच्या नादात देशाचे नुकसान झालय असा आरोप त्यांनी केला. 

पिंपरी - तलाठी भरती घोटाळा पुढे आला. घोटाळा झाला तो झाला, पण २०० पैकी २१४ मार्क एका विद्यार्थ्याला मिळाले. त्यामुळे ज्याला एक खातं चालवता येत नाही त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवलंय असाच हा घोटाळा झालाय अशा शब्दात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. 

ठाकरे गटाकडून पिंपरी चिंचवड येथे महानिष्ठा, महान्याय सभा आयोजित करण्यात आली होती. त्याठिकाणी आदित्य ठाकरेंनी सरकारवर घणाघात केला. आदित्य ठाकरे म्हणाले की, आज राज्यातील सगळे प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत. वेदांता फॉक्सकॉन कंपनी आता गुजरातमध्येही होणार नाही आहे. या कंपनीने त्यांचा करार रद्द केला आहे. कारण या कंपनीला तिथे कारखाना उभारायला सात वर्षे लागणार होती. त्यामुळे त्यांनी देशातूनच आता हद्दपार व्हायचा निर्णय घेतला आहे. म्हणजे गुजरातचं भलं करण्याच्या नादात देशाचे नुकसान झालय असा आरोप त्यांनी केला. 

तसेच या सभेत आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या हिंदुत्वाचा पुनरुच्चार केला. २२ जानेवारीला अयोध्येत मोठा दिवस असून श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे . पण हृदयात राम आणि हाताला काम हे आपलं हिंदुत्व आहे. राज्यात आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत. सत्तेत आलो की पहिल्याच बैठकीत आरक्षण मिळवून देऊ असे हे म्हणाले होते . मात्र आरक्षणासाठी मराठा समाजाला मोर्चा काढावा लागतोय, पण हे सरकार आरक्षण देऊ शकले नाही . या सरकारने रोजगार मिळवून देण्याचीही हमी दिली होती, महागाई हद्दपार करू म्हणाले होते. पण या प्रश्नांकडे आता पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ ७० वर्षांपूर्वी त्यांनी काय केले? हेच विचारण्यात ते मश्गुल आहेत असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, आता पुढे किती वर्षे तेच तेच उकरून काढणार आहात? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, पण कुठेही दंगली घडू दिल्या नाही असं सांगत आदित्य ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा