शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

"ज्याला एक खाते चालवता येत नाही, त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 18:09 IST

गुजरातचं भलं करण्याच्या नादात देशाचे नुकसान झालय असा आरोप त्यांनी केला. 

पिंपरी - तलाठी भरती घोटाळा पुढे आला. घोटाळा झाला तो झाला, पण २०० पैकी २१४ मार्क एका विद्यार्थ्याला मिळाले. त्यामुळे ज्याला एक खातं चालवता येत नाही त्याला घटनाबाह्य मुख्यमंत्री बनवलंय असाच हा घोटाळा झालाय अशा शब्दात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. 

ठाकरे गटाकडून पिंपरी चिंचवड येथे महानिष्ठा, महान्याय सभा आयोजित करण्यात आली होती. त्याठिकाणी आदित्य ठाकरेंनी सरकारवर घणाघात केला. आदित्य ठाकरे म्हणाले की, आज राज्यातील सगळे प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत. वेदांता फॉक्सकॉन कंपनी आता गुजरातमध्येही होणार नाही आहे. या कंपनीने त्यांचा करार रद्द केला आहे. कारण या कंपनीला तिथे कारखाना उभारायला सात वर्षे लागणार होती. त्यामुळे त्यांनी देशातूनच आता हद्दपार व्हायचा निर्णय घेतला आहे. म्हणजे गुजरातचं भलं करण्याच्या नादात देशाचे नुकसान झालय असा आरोप त्यांनी केला. 

तसेच या सभेत आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या हिंदुत्वाचा पुनरुच्चार केला. २२ जानेवारीला अयोध्येत मोठा दिवस असून श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे . पण हृदयात राम आणि हाताला काम हे आपलं हिंदुत्व आहे. राज्यात आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत. सत्तेत आलो की पहिल्याच बैठकीत आरक्षण मिळवून देऊ असे हे म्हणाले होते . मात्र आरक्षणासाठी मराठा समाजाला मोर्चा काढावा लागतोय, पण हे सरकार आरक्षण देऊ शकले नाही . या सरकारने रोजगार मिळवून देण्याचीही हमी दिली होती, महागाई हद्दपार करू म्हणाले होते. पण या प्रश्नांकडे आता पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ ७० वर्षांपूर्वी त्यांनी काय केले? हेच विचारण्यात ते मश्गुल आहेत असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, आता पुढे किती वर्षे तेच तेच उकरून काढणार आहात? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, पण कुठेही दंगली घडू दिल्या नाही असं सांगत आदित्य ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा