शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शहरातील फेरीवाल्यांवर कारवाई

By admin | Updated: April 4, 2017 03:39 IST

शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने पुन्हा धडक कारवाई सुरू केली

नवी मुंबई : शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने पुन्हा धडक कारवाई सुरू केली आहे. एकाच दिवसामध्ये तब्बल ९०० फेरीवाले हटविण्यात आले असून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथ, रस्त्यांवर अतिक्रमण करण्यास सुरवात केली होती. याविषयीचे वृत्त लोकमतने ३ एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर पालिका प्रशासनाने बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा या आठही प्रभागांमध्ये एकाच वेळी मोहीम राबविण्यात आली. रोड, पदपथ, रहदारीला अडथळा होईल अशा ठिकाणी बसलेल्या फेरीवाल्यांना हटविण्यात आले. रसवंतीगृह, खाद्यपदार्थ विक्री व बनविणारे, हॉटेलसह इतर दुकानांच्या बाहेर ठेवलेले साहित्यही जप्त केले आहे. पुन्हा फेरीवाल्यांनी अतिक्रमण करू नये यासाठी त्यांचे सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून ते कोपरखैरणेमधील जुन्या क्षेपणभूमीवरील गोडावूनवर ठेवण्यात आले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, अतिक्रमण उपआयुक्त अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरात कुठेही अनधिकृतरीत्या व्यवसाय होत असेल व फेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास होत असेल तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्यांनाही हटविण्यात येणार असल्याचे सर्व विभाग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शहरात एकाच दिवशी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने अनधिकृत फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहे.