शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

देशातील ३८ हजार तृतीयपंथींना आधारकार्ड

By admin | Updated: September 27, 2014 06:05 IST

देशात सुमारे ४९ कोटी तृतीयपंथी असल्याचे सर्वेक्षणाद्वारे उघड झाले आहे

सुरेश लोखंडे, ठाणेदेशात सुमारे ४९ कोटी तृतीयपंथी असल्याचे सर्वेक्षणाद्वारे उघड झाले आहे. यातील सुमारे ३८ हजार जणांना आधारकार्ड देण्यात आल्याचा दावा केंद्र शासनातर्फे केला जात आहे. ठाण्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने तृतीयपंथींच्या हक्क व अधिकारांसंदर्भात अयोजित केलेल्या शिबिरातून ही माहिती उघड झाली आहे. देशातील तृतीयपंथींना अधिकार व हक्कांसह सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानुसार, केंद्र शासनासह राज्य पातळीवर प्रतिनिधी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रतिनिधी समितीवर महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव उज्ज्वल उके यांची विशेष निमंत्रक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. देशातील तृतीयपंथींचे सर्वेक्षण करून केंद्र शासनासह विविध राज्यांद्वारे त्यांना विविध सवलती दिल्या जात आहेत. तृतीयपंथींच्या निवाऱ्याची समस्य दूर करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाच्या राजीव आवास योजनेद्वारे त्यांना घरकुल प्राप्त करून दिले जाणार आहे. तामिळनाडूमध्ये ‘वेल्फेअर बोर्ड’ स्थापन करून सुमारे ४,२९४ जणांची नोंद करून यापैकी ३,३२८ जणांना ओळखपत्र देण्यात आले आहे. १,५४४ जणांना रेशनिंग कार्डवाटप केले आहे. याशिवाय १,०५२ जणांना घरासाठी जागेचे वाटप केले आहे़ १०२ जणांना टेलरिंगचे प्रशिक्षण देऊन शिलाई मशीन दिल्याचे शिबिरात सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद केले आहे.नवी दिल्ली येथील समाज कल्याण विभागाच्या सहायक संचालक कार्यालयाच्या वतीने तृतीयपंथीयांना दरमहा एक हजार रुपये मानधन दिले जात आहे. राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू या राज्यांमध्ये त्यांना पेन्शन लागू केले आहे. याशिवाय, त्यांना ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याचा प्रयत्न केंद्र शासनाद्वारे केला जात आहे. मतदानाचा हक्क देण्यासाठी त्यांची मतदार म्हणून नोंद करण्यात येत आहे. मतदार यादीमध्ये मेल, फिमेल मतदार नोंदणीप्रमाणे त्यांची ‘टी’ (ट्रान्सजेंडर) म्हणून नोंद केली जाणार आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनांचा लाभ देण्यासह सोयीसुविधा व निवाऱ्याच्या समस्या केंद्र व राज्य शासनाद्वारे सोडवण्यात येणार आहेत. यासाठी राज्य पातळीवर सल्लागार समितीदेखील गठीत करण्यात आली आहे.