शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

अबब..! कृष्णा नदीतून वाहिले तब्बल ६०० टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 12:19 PM

भीमा आणि कृष्णा खोऱ्यामधे जुलैचा शेवटचा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार वृष्टी झाली.

ठळक मुद्देकृष्णा-भीमा खोऱ्यात उदंड पाऊस :धरणे भरल्यानंतर भीमा नदीतून सोडले बारा पानशेतचे पाणीपुणे शहराची तब्बल सहा वर्षे तहान भागवू शकेल इतके पाणी कोयना मावते धरणात

विशाल शिर्केपुणे : पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील धरणे पाणी पिऊन तृप्त झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून देण्यात आले. तेही थोडे थोडके नव्हे तर तब्बल सहा कोयना धरणे भरतील इतके पाणी कृष्णेत सोडण्यात आले. त्यातील तब्बल पाच कोयना धरणांचे पाणी कोल्हापूर-महाबळेश्वरच्या घाटरांगांमधून कृष्णेत आले.भीमा आणि कृष्णा खोऱ्यामधे जुलैचा शेवटचा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार वृष्टी झाली. राज्यात उजनी धरणाची एकूण साठ्याची क्षमता सर्वाधिक ११७.४७ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकी आहे. तर, कोयना धरणाची उपयुक्त साठ्याची क्षमता सर्वाधिक १०० टीएमसी आहे. पुणे शहराची तब्बल सहा वर्षे तहान भागवू शकेल इतके पाणी कोयना धरणात मावते. कृष्णा खोऱ्यातील घाटमाथ्यावर ऑगस्टच्या सुरुवातीस झालेल्या पावसामुळे सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यातील कराडमधे पूरस्थिती उद्भवली होती. लाखो लोकांना स्थलांतरीत करावे लागले. कोट्यवधीरुपयांचे नुकसान या जिल्ह्यांत झाले. कृष्णेच्या प्रमुख उपनद्यांपैकी असलेल्या कोयना, दूधगंगा, पंचगंगा, वारणा या नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी कृष्णेत जमा झाले होते. कृष्णा नदीच्या खोऱ्यात कोयना धरणासह धोम, वारणावती, दूधगंगा, राधानगरी, ऊरमोडीसह १३ प्रमुख धरणे आहेत. यात सध्या २०८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. येरळवाडी धरणात ०.४७ टीएमसी (६७ टक्के) पाणी आहे. हा अपवाद वगळता सर्व धरणात गुरुवार अखेरीस (दि. ५) ९५ ते १०० टक्के पाणीसाठा होता. ही धरणे भरल्यानंतरही अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. कृष्णेत यंदाच्या मॉन्सूनमधे राजापूर बंधाऱ्यातून ४२० टीएमसी पाणी कर्नाटकातील अलमट्टी धरणात गेले. तर, दूधगंगा नदीतून जवळपास ८० टीएमसी पाणी कृष्णेत पोहचले. म्हणजेच तब्बल ५०० टीएमसी अतिरिक्त पाणी कृष्णेतून पुढे आंध्रप्रदेशाकडे वाहिले. भीमा नदीच्या खोऱ्यातही यंदा जोरदार वृष्टी झाली. या खोºयातील २३ धरणांपैकी माणिकडोह, मुळशी, पवना, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरसह १८ धरणांचे पाणी उजनी नदीत येते. उजनी धरणाची क्षमता ११७ टीएमसी असून, त्यात ५३.५७ उपयुक्त आणि ६३.६५ मृतसाठा आहे. जून महिन्यात धरणातील मृतसाठा देखील उणे होता. एकट्या,खडकवासला साखळीतील धरणातून ४ ते ८ ऑगस्ट दरम्यान २२.५० टीएमसी पाणी उजनीत जमा झाले. जिल्ह्यातील धरणातील पाण्याने उजनी धरण पूर्ण भरल्यानंतर तब्बल ७० टीएमसी पाणी भीमेत सोडण्यात आले.  

टॅग्स :PuneपुणेDamधरणriverनदीRainपाऊस