शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सातव्या वेतन आयोगासाठी तिजोरीवर ४६,५३० कोटींचा भार

By अतुल कुलकर्णी | Updated: August 10, 2018 05:23 IST

सातव्या वेतन आयोगामुळे राज्याच्या तिजोरीवर ४६,५३० कोटींचा भार पडणार असून त्यातील २१,५३० कोटी रुपये वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होईल त्या दिवसापासून दरवर्षी द्यावे लागतील.

मुंबई : सातव्या वेतन आयोगामुळे राज्याच्या तिजोरीवर ४६,५३० कोटींचा भार पडणार असून त्यातील २१,५३० कोटी रुपये वेतन आयोग प्रत्यक्ष लागू होईल त्या दिवसापासून दरवर्षी द्यावे लागतील. उर्वरित २५ हजार कोटी आधीच्या वेतन आयोगांप्रमाणे ‘जीपीएफ’मध्ये टप्प्याटप्प्याने द्यावे लागतील.वेतन आयोगाच्या अंमलबजावणसाठी नियुक्त बक्षी समितीचे काम पूर्ण होत आले आहे. अहवालानंतर संबंधित संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला दिली.महाराष्टÑात सातवा वेतन आयोग लागू होणाऱ्या कर्मचाºयांची संख्या १८,१३,४५८ एवढी आहे. सध्या वेतन आणि निवृत्तिवेतनावर सध्या दरमहा ९४०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. यातील ४ रुपये वेतनावर तर १ रुपया निवृत्तिवेतनाचे आहेत. मात्र सातव्या वेतन आयोगामुळे अधिकारी, कर्मचाºयांच्या पगारात २३.५५ टक्के वाढ होणार आहे.केंद्र शासनाने सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू केलाय. आपल्याकडे ज्या तारखेपासून हा आयोग लागू होईल त्या आधीच्या फरकाची रक्कम साधारणपणे २५ हजार कोटींच्या घरात जाते. आधीच्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कमदेखील दोन ते तीन टप्प्यांत जीपीएफमध्ये जमा केली होती. ही रक्कमदेखील त्याच पद्धतीने कर्मचाºयांच्या जीपीएफमध्ये जमा होईल. ही रक्कम कर्मचाºयांचीच असल्यामुळे ती जीपीएफमध्ये राहिली तर त्यांचा त्यात फायदाच आहे. मात्र ती काढण्यासाठी दोन वर्षांचा लॉकिंग पिरीएड असू शकतो. मात्र या गोष्टी बक्षी समितीचा अहवाल आल्यानंतरच निश्चित होतील. शिवाय एकदम २५ हजार कोटी रुपये एका वर्षात दिले तर राज्यात कोणत्याही योजनाच राबवता येणार नाहीत, ही वस्तुस्थिती अधिकारी, कर्मचाºयांनाही माहिती आहे. त्यामुळे तेदेखील राज्य अडचणीत येईल अशा मागण्या करणार नाहीत, असेही मुनगंटीवार या वेळी म्हणाले.कर्मचारी संपाचा प्रशासनावर फरक पडला नाही; कारण मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर होते, असे सांगून मुनगंटीवार यांनी एकूण १८,१३,४५८ कर्मचाºयांपैकी फक्त १,८५,५४० कर्मचारी संपावर होते, असा दावा केला. कोठे किती कर्मचारी संपावर गेले याची आकडेवारी देताना ते म्हणाले, मंत्रालयात ५४०६ अधिकारी, कर्मचारी काम करतात. त्यापैकी १५ जण रजेवर होते तर ४१८१ हजर होते. फक्त १२१० कर्मचारी संपावर होते.>८ आॅगस्टची संपाची स्थितीविभाग एकूण रजेवर हजर संपावरमंत्रालय ५४०६ १५ ४१८१ १२१०क्षेत्रीय कार्यालये ६९,८९३ ५६७३ ३७,३४० २६,८८०कोकण विभाग ५५,२९० १४११ २९,०५४ २४,८२५नागपूर विभाग ६६,३५३ ११२६ २५,९०३ ३९,३२४पुणे विभाग ७६,७०५ १८७५ ३६,७३२ ४३,९३१औरंगाबाद विभाग १,१३,९७८ १७९२ ६३,८७१ ४८,०४८नाशिक विभाग ७९,८२१ १७५२ ४८,६५६ २९,४१२अमरावती विभाग आकडेवारी आलेली नाही

टॅग्स :MONEYपैसा