शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

राज्यात अभियांत्रिकीच्या ४३ टक्के जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 1:06 AM

मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्यामुळे मागील प्रवेशांप्रमाणेच काहीशी स्थिती यंदा पाहायला मिळत आहे.

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी शिक्षणाचा घसरलेला दर्जा तसेच काही विशिष्ट शाखांमध्ये नोकऱ्यांची संधी कमी झाल्याने अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळण्याचे प्रमाण यंदाही कमीच आहे. राज्यातील अभियांत्रिकी पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया संपली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने पुरविलेल्या माहितीनुसार यंदा पदवी प्रवेशाच्या ५६ हजार ४८८,पदविका प्रवेशाच्या ७१ हजार ९५४ तर पदव्युत्तर प्रवेशाच्या ८०९९ जागा रिक्त आहेत. यंदा प्रवेशाच्या एकूण जागांमध्ये घट करण्यात आल्याने यंदाच्या प्रवेशाची स्थिती मागील वर्षीप्रमाणेच आहे.केंद्र सरकारने यंदा लागू केलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास संवर्ग (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अत्यल्प विद्यार्र्थ्यांनी घेतला आहे. यामुळे इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्ट आदी अभ्यासक्रमांच्या शेकडो जागा रिक्त राहिल्या आहेत. या कोट्यातील अभियांत्रिकी पदवीच्या ८२ टक्के तर पदव्युत्तर अभियांत्रिकीच्या ९४ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्यामुळे मागील प्रवेशांप्रमाणेच काहीशी स्थिती यंदा पाहायला मिळत आहे.अभियांत्रिकीच्या पदवीच्या शासकीय संस्थामधील ९८ शासकीय अनुदानित संस्थांमधील ३२ तर विनाअनुदानित संस्थांमधील ८१५० अशा एकूण ८ हजार ३७२ जागा रिक्त राहिल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गासाठी यंदा १० हजार २४९ जागा उपलब्ध होत्या, त्यातील केवळ १८७७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.हीच परिस्थिती अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर प्रवेशाची आहे. पदव्युत्तर अभियांत्रिकीच्या यंदा आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गासाठी एकूण ११६० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी केवळ ६९ जागांवर प्रवेश निश्चित होऊन १०९१ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामधील शाकीय संस्थांमधील रिक्त जागांची संख्या ६१, शासकीय अनुदानित संस्थांमधील रिक्त जागांची संख्या ६८ तर विनाअनुदानित संस्थांमधील रिक्त जागांची संख्या ९२३ आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र