शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

राज्यातील कांदा अनुदानाचे ३८५ कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 7:34 PM

राज्यात आतापर्यंत ११२ कोटी वाटप; नाशिक, अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांसाठी सर्वाधिक रक्कम

ठळक मुद्दे दर घसरल्याने प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील शेतकºयांना ३८५ कोटी रुपये अनुदानापोटी देय आहेतआतापर्यंत ११२ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले असल्याचे सांगण्यात आले

सोलापूर: दर घसरल्याने प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील शेतकºयांना ३८५ कोटी रुपये अनुदानापोटी देय आहेत. यामध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यांसाठी सर्वाधिक रक्कम आहे. आतापर्यंत ११२ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले असल्याचे सांगण्यात आले.

यावर्षी राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. पाऊस कमी पडल्याने पाण्याची वानवा असताना शेतकºयांनी अन्य पिकांना फाटा देत कांद्याचे उत्पादन घेतले. कमी कालावधीत अधिक पैसे मिळतील, या भावनेतून सगळीकडे कांद्याचे पीक घेतले. अमाप उत्पादन झाल्याने कांद्याचे दर आॅक्टोबरनंतर घसरण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यात दरात अधिकच घसरण झाली. त्यानंतर कांदादर काही सावरला नाही. शासनाने प्रति क्विंटल २०० रुपये व एका शेतकºयाला दोनशे क्विंटलपर्यंतचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेतकºयांकडून अर्ज मागविण्यात आले. 

सुरुवातीला नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विक्री झालेल्या कांद्यासाठी अर्ज केलेल्या शेतकºयांसाठी ११५ कोटी रुपये बाजार समित्यांना दिले. त्यापैकी ११२ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले आहेत. 

त्यानंतर फेब्रुवारी अखेरपर्यंतच्या अर्जानुसार राज्यभरातील बाजार समित्यांनी जिल्हा उपनिबंधकांमार्फत अनुदानाची मागणी केली आहे. राज्यातून ३८५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. पणन मंडळाने ही रक्कम शासनाकडे केली असून अद्याप शासनाकडून काहीच रक्कम मिळाली नाही. यामध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांची सर्वाधिक रक्कम असल्याचे सांगण्यात आले. शासनाकडून निधी आल्याशिवाय शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. 

खरीप पेरणीसाठी पैशाची गरज - पावसाळा सुरू झाल्याने शेतकºयांना खरीप पेरणीची ओढ लागली आहे. कांद्याचे अनुदान मिळाले तर खरीप पेरणीसाठी ही रक्कम उपयोगात येणार आहे. पाण्याअभावी बहुतांशी बागायती क्षेत्र सध्या कोरडे पडले आहे. चांगला पाऊस पडल्यास या क्षेत्रावर खरीप पेरणी करण्यास सोयीचे होणार आहे. मात्र, कांदा अनुदान शासनाने दिले तरच.. 

सोलापूरसाठी ३७ कोटींची मागणी- सोलापूर जिल्ह्यासाठी ३६ कोटी ७० लाख ३० हजार रुपयांची मागणी जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी केली आहे. ३३ हजार ११८ शेतकºयांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करावयाची आहे. शेतकºयांची बँक खाती तयार असून, शासनाकडून पैसे आल्यास तत्काळ खात्यावर जमा करण्याची तयारी बाजार समित्यांनी केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारonionकांदाFarmerशेतकरीagricultureशेतीgovernment schemeसरकारी योजना