शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

सत्तेसाठी नेते एकमेकांना भिडत असताना 300 शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 9:59 AM

सरकारी आकड्यांवर नजर टाकल्यास ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे 70 टक्के नुकसान झाले. 2015 मध्ये एका महिन्यात राज्यातील शेतकरी आत्महत्यांनी 300 चा आकडा पार केला होता.

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात नेतेमंडळी सत्तास्थापनेसाठी कसरत करण्यात व्यस्त होती. त्याचवेळी राज्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकासानीमुळे खचून गेलेल्या 300 शेतकऱ्यांनी या कालावधीत आत्महत्या केल्या. 

मागील चार वर्षांत एक महिन्यात एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करणे हा आकडा मोठा आहे. याआधी 2015 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी अनेकदा  एक महिन्यात 300 आत्महत्यांचा आकडा पार केला होता. नोव्हेंबरमध्ये शेतकरी नैसर्गिक आपत्तीशी लढत होते. तर महाराष्ट्रातील राजकीय पुढारी तोडफोडीचं राजकारण करण्यात व्यस्त होते. 

सरकारी आकड्यांवर नजर टाकल्यास ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे 70 टक्के नुकसान झाले. 2015 मध्ये एका महिन्यात राज्यातील शेतकरी आत्महत्यांनी 300 चा आकडा पार केला होता.

दरम्यान राज्यातील मराठवाडा विभागात नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक 120 आत्महत्या झाल्या. तर विदर्भात 112 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. 2019 मध्ये एकूण 2532 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तर 2018 मध्ये हा आकडा 2518 एवढा होता. सरकारी आकडेवारीनुसार अतिवृष्टीमुळे एक कोटी शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे.