शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

२०५ रिक्षा वाढवणार कोंडी

By admin | Updated: April 5, 2017 03:57 IST

कल्याण आरटीओ कार्यालयाकडून १५ एप्रिलच्या आत रिक्षांचे २०५ नवे परवाने दिले जाणार आहेत.

अनिकेत घमंडी,डोंबिवली- कल्याण आरटीओ कार्यालयाकडून १५ एप्रिलच्या आत रिक्षांचे २०५ नवे परवाने दिले जाणार आहेत. आरटीओ हद्दीतील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा या शहरांमध्ये आधीच वाहतुकीच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. त्यातच या नवीन रिक्षांची भर पडणार असल्याने कोंडी आणखी वाढणार आहे. डोंबिवलीत अंदाजे १०० रिक्षा वाढणार असल्याने नवीन परवाने देऊ नयेत, असा पवित्रा डोंबिवलीकरांनी घेतला आहे. शहर वाहतूक नियंत्रण विभाग व कल्याण आरटीओकडे त्यांनी तशी मागणी केली आहे.डोंबिवली पूर्वेतील रामनगर आणि राजाजी पथ परिसरातील रहिवासी वाढत्या कोडींमुळे बेजार झाले आहेत. वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी त्यांनी वाहतूक विभागाकडे लावून धरली आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता त्यांनी रिक्षांच्या नवीन परवान्यांच्या वितरणाबाबत जागृती सुरू केली आहे. नवीन परवाने देऊन शहराची कोंडी आणखी वाढवू नये, वाहनतळ, पार्किंगची व्यवस्था, एकेरी मार्ग, दुचाकीचे मार्ग, अवजड वाहनांना गर्दीच्या वेळेत शहरात प्रवेशबंदी, अशा विविध नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. शहरातील कोंडीचे नियोजन महत्त्वाचे आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी रेल्वेस्थानक परिसरात होणारी कोंडी कमी व्हावी, यासाठी होमगार्ड आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे.रिक्षाचालकांमुळे कोंडी होत असल्याने त्यांना शिस्त लावणे, स्थानक परिसरातील बेकायदा रिक्षा स्टॅण्ड रद्द करून एकच मुख्य स्टॅण्ड सुरू करणे. त्यासाठी रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेणे, नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत संकेत देण्याची मागणी रामनगर आणि राजाजी पथ परिसरातील रहिवाशांनी केली आहे. कल्याण आरटीओ हद्दीत अधिकृत २० हजार रिक्षा आहेत. त्यापैकी १८ हजार सीएनजी, ५०० एलपीजी तर उर्वरित पेट्रोल आणि डिझेल धावत आहेत. बेकायदा रिक्षांचीही संख्या हजारोंच्या घरात आहे. अशा रिक्षांवर सातत्याने कारवाई करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि या बाबींवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर शहरांच्या गरजेनुसार नवीन रिक्षांना आरटीओने परवानगी द्यावी, अशी डोंबिवलीकरांची अपेक्षा आहे. पण आधीच कोंडीमुळे कंबरडे मोडलेल्या शहराला आणखी विस्कळीत का करता, असा सवाल त्यांनी केला आहे.हिंदी भाषिकांना परवाने न देण्यासंदर्भात उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेचा निकाल नुकताच लागला आहे. त्यातील कल्याण आरटीओअंतर्गत २०५ परवाने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ते १५ एप्रिलपर्यंत देण्याच्या सूचना आहेत. - नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक अधिकारी, कल्याण