शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
3
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
4
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
5
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
6
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
7
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
8
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
9
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
10
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
11
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
12
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
13
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
14
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
15
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
16
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
17
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
18
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
19
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
20
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी

२०५ रिक्षा वाढवणार कोंडी

By admin | Updated: April 5, 2017 03:57 IST

कल्याण आरटीओ कार्यालयाकडून १५ एप्रिलच्या आत रिक्षांचे २०५ नवे परवाने दिले जाणार आहेत.

अनिकेत घमंडी,डोंबिवली- कल्याण आरटीओ कार्यालयाकडून १५ एप्रिलच्या आत रिक्षांचे २०५ नवे परवाने दिले जाणार आहेत. आरटीओ हद्दीतील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा या शहरांमध्ये आधीच वाहतुकीच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. त्यातच या नवीन रिक्षांची भर पडणार असल्याने कोंडी आणखी वाढणार आहे. डोंबिवलीत अंदाजे १०० रिक्षा वाढणार असल्याने नवीन परवाने देऊ नयेत, असा पवित्रा डोंबिवलीकरांनी घेतला आहे. शहर वाहतूक नियंत्रण विभाग व कल्याण आरटीओकडे त्यांनी तशी मागणी केली आहे.डोंबिवली पूर्वेतील रामनगर आणि राजाजी पथ परिसरातील रहिवासी वाढत्या कोडींमुळे बेजार झाले आहेत. वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी त्यांनी वाहतूक विभागाकडे लावून धरली आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता त्यांनी रिक्षांच्या नवीन परवान्यांच्या वितरणाबाबत जागृती सुरू केली आहे. नवीन परवाने देऊन शहराची कोंडी आणखी वाढवू नये, वाहनतळ, पार्किंगची व्यवस्था, एकेरी मार्ग, दुचाकीचे मार्ग, अवजड वाहनांना गर्दीच्या वेळेत शहरात प्रवेशबंदी, अशा विविध नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. शहरातील कोंडीचे नियोजन महत्त्वाचे आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी रेल्वेस्थानक परिसरात होणारी कोंडी कमी व्हावी, यासाठी होमगार्ड आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे.रिक्षाचालकांमुळे कोंडी होत असल्याने त्यांना शिस्त लावणे, स्थानक परिसरातील बेकायदा रिक्षा स्टॅण्ड रद्द करून एकच मुख्य स्टॅण्ड सुरू करणे. त्यासाठी रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेणे, नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत संकेत देण्याची मागणी रामनगर आणि राजाजी पथ परिसरातील रहिवाशांनी केली आहे. कल्याण आरटीओ हद्दीत अधिकृत २० हजार रिक्षा आहेत. त्यापैकी १८ हजार सीएनजी, ५०० एलपीजी तर उर्वरित पेट्रोल आणि डिझेल धावत आहेत. बेकायदा रिक्षांचीही संख्या हजारोंच्या घरात आहे. अशा रिक्षांवर सातत्याने कारवाई करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि या बाबींवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर शहरांच्या गरजेनुसार नवीन रिक्षांना आरटीओने परवानगी द्यावी, अशी डोंबिवलीकरांची अपेक्षा आहे. पण आधीच कोंडीमुळे कंबरडे मोडलेल्या शहराला आणखी विस्कळीत का करता, असा सवाल त्यांनी केला आहे.हिंदी भाषिकांना परवाने न देण्यासंदर्भात उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेचा निकाल नुकताच लागला आहे. त्यातील कल्याण आरटीओअंतर्गत २०५ परवाने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ते १५ एप्रिलपर्यंत देण्याच्या सूचना आहेत. - नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक अधिकारी, कल्याण