शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२०५ रिक्षा वाढवणार कोंडी

By admin | Updated: April 5, 2017 03:57 IST

कल्याण आरटीओ कार्यालयाकडून १५ एप्रिलच्या आत रिक्षांचे २०५ नवे परवाने दिले जाणार आहेत.

अनिकेत घमंडी,डोंबिवली- कल्याण आरटीओ कार्यालयाकडून १५ एप्रिलच्या आत रिक्षांचे २०५ नवे परवाने दिले जाणार आहेत. आरटीओ हद्दीतील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा या शहरांमध्ये आधीच वाहतुकीच्या नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. त्यातच या नवीन रिक्षांची भर पडणार असल्याने कोंडी आणखी वाढणार आहे. डोंबिवलीत अंदाजे १०० रिक्षा वाढणार असल्याने नवीन परवाने देऊ नयेत, असा पवित्रा डोंबिवलीकरांनी घेतला आहे. शहर वाहतूक नियंत्रण विभाग व कल्याण आरटीओकडे त्यांनी तशी मागणी केली आहे.डोंबिवली पूर्वेतील रामनगर आणि राजाजी पथ परिसरातील रहिवासी वाढत्या कोडींमुळे बेजार झाले आहेत. वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी त्यांनी वाहतूक विभागाकडे लावून धरली आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून आता त्यांनी रिक्षांच्या नवीन परवान्यांच्या वितरणाबाबत जागृती सुरू केली आहे. नवीन परवाने देऊन शहराची कोंडी आणखी वाढवू नये, वाहनतळ, पार्किंगची व्यवस्था, एकेरी मार्ग, दुचाकीचे मार्ग, अवजड वाहनांना गर्दीच्या वेळेत शहरात प्रवेशबंदी, अशा विविध नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. शहरातील कोंडीचे नियोजन महत्त्वाचे आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी रेल्वेस्थानक परिसरात होणारी कोंडी कमी व्हावी, यासाठी होमगार्ड आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे.रिक्षाचालकांमुळे कोंडी होत असल्याने त्यांना शिस्त लावणे, स्थानक परिसरातील बेकायदा रिक्षा स्टॅण्ड रद्द करून एकच मुख्य स्टॅण्ड सुरू करणे. त्यासाठी रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेणे, नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत संकेत देण्याची मागणी रामनगर आणि राजाजी पथ परिसरातील रहिवाशांनी केली आहे. कल्याण आरटीओ हद्दीत अधिकृत २० हजार रिक्षा आहेत. त्यापैकी १८ हजार सीएनजी, ५०० एलपीजी तर उर्वरित पेट्रोल आणि डिझेल धावत आहेत. बेकायदा रिक्षांचीही संख्या हजारोंच्या घरात आहे. अशा रिक्षांवर सातत्याने कारवाई करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि या बाबींवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर शहरांच्या गरजेनुसार नवीन रिक्षांना आरटीओने परवानगी द्यावी, अशी डोंबिवलीकरांची अपेक्षा आहे. पण आधीच कोंडीमुळे कंबरडे मोडलेल्या शहराला आणखी विस्कळीत का करता, असा सवाल त्यांनी केला आहे.हिंदी भाषिकांना परवाने न देण्यासंदर्भात उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेचा निकाल नुकताच लागला आहे. त्यातील कल्याण आरटीओअंतर्गत २०५ परवाने देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ते १५ एप्रिलपर्यंत देण्याच्या सूचना आहेत. - नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक अधिकारी, कल्याण