शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
2
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
3
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
4
अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
6
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?
7
भाजपाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे तर...
8
सत्ताधाऱ्यांकडून मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता, सतर्क राहा, जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना पत्र
9
अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दिला महागाईचा झटका; दुधाच्या दरात केली वाढ
10
पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत, सीएसएमटी स्थानकात तांत्रिक बिघाड
11
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
12
PHOTOS : शुबमन आणि रिद्धिमा लग्न करणार? अभिनेत्रीनं सोडलं मौन, तिचं धक्कादायक उत्तर
13
“अब की बार फिर मोदी सरकार”; भारतातील लोकसभा निवडणुकीच्या Exit Poll वर चीनची प्रतिक्रिया
14
PM Modi PSU Stocks : कोणी १०% वाढला... तर कोणी केला रकॉर्ड; PM Modiनी सांगितलेले शेअर्स बनले रॉकेट
15
महफिल फिरसे जमेगी! 'लाहोर नाही आता मुंबईत...' नेटफ्लिक्सने केली 'हीरामंडी 2' ची घोषणा
16
T20 World Cup 2024: क्रिकेटला पुन्हा ग्लॅमरचा तडका! आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली 'महाराष्ट्राची लेक'
17
एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...
18
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
19
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
20
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी

२० वर्षांपासून विद्यार्थिनींची निवास व्यवस्था वर्गखोलीतच !

By admin | Published: November 14, 2016 8:33 PM

खामगाव तालुक्यातील पाळा येथील आदिवासी विभागाच्या निवासी आश्रम शाळेतच नव्हे तर सामाजिक न्याय विभागाच्या निवासी आश्रम शाळेतही विद्यार्थिनींच्या

ऑनलाइन लोकमत/ गणेश मापारी  
खामगाव, (जि.बुलडाणा), दि.14 -  खामगाव तालुक्यातील पाळा येथील आदिवासी विभागाच्या निवासी आश्रम शाळेतच नव्हे तर सामाजिक न्याय विभागाच्या निवासी आश्रम शाळेतही विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत शाळा व्यवस्थापनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याची बाब समोर आली आहे. तब्बल २० वर्षांपासून या शाळेतील विद्यार्थिनींची निवास व्यवस्था वर्गखोलीतच करण्यात आली असून या शाळेवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने शाळेला अनुदानाची खिरापत वाटल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पाळा येथील आदिवासी विभागाच्या निवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या निवासासाठी योग्य व्यवस्था नव्हती त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना रात्री वर्गखोलीतच झोपण्याबाबत दबाव टाकण्यात येत होता. ही बाबही पोलिस तपासात समोर आली आहे.
दरम्यान निवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी निवासाकरिता स्वतंत्र व्यवस्था असणे बंधनकारक आहे. असे असतानाही पाळा येथील दोन्ही विभागाच्या आश्रम शाळेने निवास व्यवस्थेबाबत गंभीरतेने घेतले नाही. वेगवेगळ्या संस्थानच्या नावे शाळा उघडून कोकरेंच्या व्यवस्थापनाने गेल्या २० वर्षांपासून करोडो रुपयांचे अनुदान लाटले आहे. आदिवासी शाळेच्या अत्याचार प्रकरणानंतर या शाळेमधील सोयी-सुविधांची दखल आता घेतली जात आहे. 
मात्र याच व्यवस्थापनाच्या दुसºया शाळेचाही भोंगळ कारभार समोर आला आहे. अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेद्वारे चालविण्यात येत असलेल्या निवासी प्राथमिक आश्रम शाळेला १८ सप्टेंबर १९९६ रोजी मान्यता देण्यात आली आहे. 
या शाळेमध्ये १९९६ पासून विद्यार्थिनी निवासी राहतात. असे असतानाही अद्याप पर्यंत विद्यार्थिनींच्या निवासासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही. ही बाब सामाजिक न्याय विभागाच्या संबंधित अधिकाºयांनीही डोळेझाक केली आहे. या प्रकाराला जबाबदार व्यवस्थापन व प्रशासनातील अधिकाºयांवर सुध्दा कारवाई करण्याची मागणी केल्या जात आहे. 
 
२० वर्षानंतर का आली जाग?
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाने गत तीन महिन्यापूर्वीच आश्रम शाळेमध्ये विद्यार्थिनींना निवासी ठेवण्याबाबत मनाई केली आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागाला २० वर्षानंतर विद्यार्थिनींची काळजी का करावी वाटली? असा प्रश्न आता या प्रकरणाच्या निमित्ताने पुढे आला आहे. आदिवासी विभागाच्या शाळेत विद्यार्थिनींवर होत असलेल्या अत्याचाराची कुणकुण लागल्यामुळेच सामाजिक न्याय विभागाच्या शाळेमध्ये विद्यार्थिनींना निवासी ठेवण्याबाबत मनाई करण्यात आली अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
 
विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणे आवश्यक
जिल्हाधिकाºयांकडून नेमण्यात आलेल्या विशेष पथकाद्वारे आश्रम शाळांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणी दरम्यान आश्रम शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसोबत संवाद साधणे गरजेचे झाले आहे. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधल्यास  शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाºया सुविधांबाबत मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.