ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:49 IST2026-01-02T10:26:58+5:302026-01-02T10:49:32+5:30

Indore Water Contamination Deaths: ज्या गोष्टीची भीती होती ती खरी ठरली आहे. इंदूरमध्ये अनेक मृत्यू दूषित पाण्यामुळे झाले असल्याचे समोर आले. इंदूरच्या भागीरथपुरा येथे अतिसारामुळे १३ मृत्यू झाले आहेत.

What was feared came true, the cause of death in Indore came to light | ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर

ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर

Indore Water Contamination Deaths: इंदूरमध्ये काही दिवसापूर्वी दूषित पाण्यामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. या प्रकरणी प्रयोगशाळेतून अहवाल येणे बाकी होते. हे अहवाल आता आले आहेत. लोकांना ज्याची भीती होती ती खरी ठरली आहे. इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे एकामागून एक अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. इंदूरच्या भागीरथपुरा येथे अतिसारामुळे १३ मृत्यू झाले आहेत, असा दावा स्थानिकांनी केला. तर प्रशासनाने फक्त चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. सध्या जवळजवळ २०० लोक रुग्णालयात दाखल आहेत. सुमारे १,४०० लोक विषारी पाण्यामुळे बाधित झाले आहेत.

ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले

गेल्या आठ वर्षांपासून मध्य प्रदेशच्या आर्थिक राजधानीच्या त्या भागात जीवघेणा पाणीपुरवठा होत असल्याचे चाचणी अहवालातून समोर आली आहे. इंदूर हे शहर गेल्या आठ वर्षांपासून देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित केले आहे. इंदूरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CMHO), डॉ. माधव प्रसाद हसनी यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की, मेडिकल कॉलेज लॅबने तयार केलेल्या अहवालात भरीरथपुरा भागात पाईपलाईनमधील गळतीमुळे पाणी दूषित झाल्याची पुष्टी झाली आहे, यामुळे अतिसाराचा प्रादुर्भाव झाला आहे. 

इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी पीटीआयला सांगितले की, डिसेंबरपासून इंदूरमध्ये दूषित पाणी पिण्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. भार्गव म्हणाले की, आरोग्य विभागाने या साथीच्या आजारामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे, तर रुग्णालयात दाखल झालेल्या आणखी चार जणांचाही मृत्यू झाला आहे.

मृत्यूंमागील कारण काय?

मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी माधव प्रसाद हसनी यांनी पूर्वी एचटीला सांगितले होते की, हे मृत्यू अतिसारामुळे झाले आहेत. रुग्णांना दूषित पाणी प्यायल्यानंतर उलट्या, अतिसार आणि डिहायड्रेशनची तक्रार आली. शौचालयाच्या खाली असलेल्या मुख्य पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गळती झाल्यामुळे पाणी दूषित झाले असावे असाही त्यांनी सल्ला दिला. भागीरथपुरा येथे, त्याच्यावर शौचालय बांधले होते, त्या मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनमध्ये गळती आढळली. यामुळे पिण्याचे पाणी दूषित झाले असावे.

Web Title : इंदौर में दूषित पानी से हुई मौतों की पुष्टि हुई

Web Summary : प्रयोगशाला की रिपोर्टों से पुष्टि हुई कि इंदौर के भागीरथपुरा में दूषित पानी से मौतें हुईं। रिसाव वाले पाइप संभावित कारण हैं। अधिकारियों ने घटना से जुड़ी सात मौतों की पुष्टि की और सैकड़ों लोग जलजनित बीमारियों के कारण अस्पताल में भर्ती हैं। अधिकारी प्रदूषण की सीमा की जांच कर रहे हैं।

Web Title : Indore Water Contamination Confirmed as Cause of Recent Deaths

Web Summary : Lab reports confirm contaminated water caused deaths in Indore's Bhagirathpura. Leaking pipes are the likely source. Officials confirm seven deaths linked to the incident and hundreds are hospitalized due to waterborne illnesses. Authorities are investigating the extent of the contamination.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.