शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भीषण दुर्घटना, शाळेतील विद्यार्थ्यांवर कोसळली भिंत, ढिगाऱ्याखाली सापडून ४ मुलांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 20:16 IST

Madhya Pradesh: मध्य प्रदेशमधील रीवा जिल्ह्यामध्ये आज एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका गावात शालेय विद्यार्थ्यांवर भिंत कोसळून झालेल्या अपघाताता ४ मुलांचा मृत्यू झाला.

मध्य प्रदेशमधील रीवा जिल्ह्यामध्ये आज एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका गावात शालेय विद्यार्थ्यांवर भिंत कोसळून झालेल्या अपघाताता ४ मुलांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलांमध्ये एकाच कुटुंबांतील तीन मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शाळा सुटल्यानंतर ही मुले शाळा सुटल्यानंतर शाळेच्या गेटजवळ उभी होती. तेवढ्यात शेजारी असलेल्या एका घराची भिंत या विद्यार्थ्यांवर कोसळली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली पाच मुलं सापडली. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. तसेच या मुलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना त्वरित संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही सर्व मुले सनऋषी शाळेचे विद्यार्थी होते. याशिवाय या दुर्घटनेत एक महिलासुद्धा जखमी झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार सतत पडत असलेल्या पावसामुळे जुन्या मातीच्या घराची भिंत ओली झाली होती. त्यामुळे ती कोसळून शाळेतील मुले तिच्या खाली सापडली. या दुर्घटनेत गुप्ता कुटुंबातील अंशिका गुप्ता, सिद्धार्थ गुप्ता आणि मान्या गुप्ता या ३ मुलांचा मृत्यू झाला. त्यांच्याबरोबरच अनुज प्रजापती या मुलाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. तर राणी प्रजापती ही महिला या दुर्घटनेत जखमी झाली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश