शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीतही आले नवीन चेहरे; कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST

लातूर : मार्च २०२० पासून कोरोना महामारीने अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे. अर्थचक्र ठप्प झाल्याने अनेक कुटुंब त्रस्त आहेत. ...

लातूर : मार्च २०२० पासून कोरोना महामारीने अनेकांचे जगणे मुश्कील झाले आहे. अर्थचक्र ठप्प झाल्याने अनेक कुटुंब त्रस्त आहेत. हजारो नागरिकांचे रोजगारही बुडाले आहेत. याच काळात गुन्हेगारी क्षेत्रात नव्या चेहऱ्यांनी शिरकाव केला आहे. सायबर गुन्हेगारी वाढली असून, कोरोनाने पोलीस दलाची मात्र डोकेदुखी वाढविली आहे.

लातूर जिल्ह्यात गुन्हेगारीचा टक्का वाढला आहे. लॉकडाऊनच्या काळात गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले. मात्र व्यवहार पूर्वपदावर आल्यानंतर गुन्हेगारीने डोके वर काढले. यात दरोडा, घरफोडी जबरी चोरी, फसवणूक, शेतीचे वाद, अपघात, मटका, जुगार आणि इतर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. नव्या चेहऱ्यांनी गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला आहे. परिणामी, कोरोना काळातील गुन्हेगारीने पोलिसांची डोकेदुखी वाढविली आहे.

गुन्हेगारी क्षेत्रात आले नवे चेहरे

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लातूरच्या गुन्हेगारीचा आलेख कमी आहे. मात्र कोरोनाने गुन्हेगारीत नवे चेहरे दाखल झाले आहेत.

नव्या गुन्हेगारांचे रेकॉर्ड आणि तपशील ठेवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे.

गुन्हेगारीत नवीन चेहरे आल्याने पोलिसांचीही चिंता वाढली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत माहिती संकलित केली जात आहे.

जिल्ह्यात घटना घडल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जाते. गुन्हेगाराला अटक करण्याची प्रक्रियाही केली जाते. यातून पुढील होणारे परिणाम रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करतात. तपासाची गती वाढविल्याने अनेक गुन्ह्यांतील गुन्हेगार २४ तासांच्या आत गळाला लागतात. -निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, लातूर

कोरोनाने आर्थिक गणित बिघडले आहे. यातून कुटुंबात मानसिक ताणतणाव वाढला आहे. अनेकांचा हक्काचा रोजगार गेल्याने प्रपंचाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योग आणि व्यवसायही डबघाईला आल्याने मानसिक त्रास अनेकांना सहन करावा लागतो. अशावेळी समुपदेशनासह आधाराची गरज आहे. - डॉ. ओमप्रकाश कदम

खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार

जिल्ह्यातील गुन्हेगारीचा टक्का समोर ठेवून पोलिसांना आता खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासात खबऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. यातून गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते.