शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार ३०३ व्यक्तींच्या चाचण्यांत आढळले १८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी ८३४ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ९ रुग्ण आढळले असून १४६९ ...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी ८३४ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ९ रुग्ण आढळले असून १४६९ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात हे रुग्ण बाधित आढळले आहेत. दोन्ही चाचण्या मिळून अठरा नव्या रुग्णांची भर पडली आहे. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या एकूण १५६ रुग्णांपैकी फक्त एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. तर नऊ रुग्ण बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. ४६ मध्यम लक्षणाचे असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लागत असून ३० रुग्ण मध्यम, परंतु विनाऑक्सिजनवर आहेत. ७० रुग्ण सौम्य लक्षणाचे असून ३५ रुग्ण आयसीयुमध्ये दाखल आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी दिली.

जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांच्या खाली आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी सहाशे दहा दिवसांवर गेला आहे. यामुळेच जिल्ह्याला दिलासा आहे. मृत्यूचे प्रमाण मात्र २.६ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत घट होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण गेल्या महिन्याभरापासून कमी झाला आहे. शिवाय जिल्ह्यातील आठशेच्यावर गावे कोरोनामुक्त झाली आहेत.